Solapur Rain : अरळी गावचा पूल पावसामुळे वाहून गेला,गावकऱ्यांचे वाहत्या पाण्यात आंदोलन|VIDEO

Solapur Rain : मुसळधार पावसामुळे बोरी नदीला पूर आल्याने अरळी गावाचा बाहेरील संपर्क तुटला आहे.प्रशासनाने तातडीने नवीन पूल बांधावा,अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील अरळी गावाचा संपर्क मुसळधार पावसामुळे तुटला आहे. बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने अरळी-दर्शनाळ-मुस्ती मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेला आहे. परिणामी गावातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, ग्रामस्थांनी संतप्त होऊन वाहत्या पाण्यात उतरून आंदोलन केले आहे.गावाचे सरपंच, उपसरपंच आणि अनेक स्थानिक नागरिकांनी या आंदोलनात भाग घेतला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा सुरू असून, मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला. स्थानिक प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नवीन पूल बांधावा,अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. पूरस्थितीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com