अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर दिवाळी सुट्ट्यांदरम्यान भाविकांसाठी तब्बल २० तास खुले राहणार आहे. देशभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या स्वामीभक्तांच्या गर्दीचा विचार करून हा मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. १६ ऑक्टोबरपासून येत्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे ३ ते रात्री ११ असे नियमितपणे २० तास खुले राहणार आहे. मुंबई, कोल्हापूरसह देशातील विविध भागांतून येणाऱ्या भाविकांना स्वामींचे दर्शन सुलभरीत्या घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात सुरक्षेची आणि शिस्तबद्ध दर्शन रांगेची योग्य तयारी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.