मराठा समाजाचा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेते हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून राज्यातील राजकीय लोकांचे देखील वेगवेगळे मत दिसत आहे. अशातच आज मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक पार प़डली. या बैठकीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. वेळ पडल्यास 50 लाख ओबीसी बांधव मुंबईत घेऊन येण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाजात नाराजी आहे. अशात मराठा नेते मनोज जरांगे आणि शासनाला जी भाषा कळेल त्या भाषेतून उत्तर देण्यावर बैठकीत एकमत झालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.