IND vs WI 2nd T20: ..तर पराभव टळू शकला असता, हार्दिक पंड्याची ही एक चूक टीम इंडियाला पडली महागात

Reason Behind Team India Defeat: हार्दिक पंड्याने केलेली एक चूक भारतीय संघाला महागात पडली आहे.
reason behind team india defeat
reason behind team india defeat saam tv
Published On

Defeat Behind Team India's Defeat: भारतीय संघाला सलग दुसऱ्या टी -२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १५२ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीजने २ गडी आणि ७ चेंडू राखून विजय मिळवला.

पिछाडीवर असलेल्या युजवेंद्र चहलने एकाच षटकात भारतीय संघाला कमबॅक करून दिले होते. मात्र त्याचे षटक शिल्लक ठेऊन हार्दिक पंड्याने मोठी चूक केली. परिणामी भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला.

reason behind team india defeat
Ind vs Wi 2nd T20I Result: एकटा पुरन टीम इंडियाला उरुन पुरला..सलग दुसऱ्या सामन्यात हार्दिक सेनेचा दारुण पराभव

या सामन्यात एक वेळ अशी होती जेव्हा निकोलस पुरन भारतीय संघाचा चांगलाच समाचार घेत होता. तो आक्रमक फलंदाजी करत वेस्टइंडीज संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. मात्र १४ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मुकेश कुमारने त्याला बाद केलं आणि पॅव्हेलियनची वाट दाखवली.

इथुन वेस्टइंडीज संघाला विजयासाठी ६ षटकात अवघ्या २७ धावांची गरज होती. रवि बिश्नोईने १६ व्या षटकात केवळ १ धावांचे षटक टाकले. त्यानंतर पुढच्याच षटकात चहलने हेटमायनरला बाद केलं. ४ षटकांचा खेळ शिल्लक होता.

या ४ पैकी १ षटक चहलचे होते. असं वाटत होतं की, हा सामना भारतीय संघ जिकंणार. मात्र हार्दिक पंड्याचा निर्णय चुकला.

युजवेंद्र चहलने ३ षटकात दमदार गोलंदाजी केली होती. त्याच्या गोलंदाजीचा रिदम पाहता त्याला चौथे षटक त्याला मिळायला हवे होते. मात्र पुढील ३ षटकात हार्दिक पंड्याने वेगवान गोलंदाजांचा वापर केलाय ज्याचा यजमानांनी चांगलाच फायदा घेतला.

वेस्टइंडीजने पुढील १७ चेंडुंमध्ये २४ धावा ठोकत भारतीय संघाचा पराभव केला. युजवेंद्र चहलला या सामन्यात आपले ४ षटक पूर्ण करता आले नाही. (Latest sports updates)

reason behind team india defeat
ODI World Cup 2023: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश; दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

भारतीय संघाचा पराभव...

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १५२ धावांचा डोंगर उभारला होता. या डावात तिलक वर्माने भारतीय संघाकडून सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली.

तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मात्र निकोलस पुरनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर वेस्टइंडीज संघाला २ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com