Irani Cup: इराणी कप चॅम्पियन्स मुंबई संघावर पैशांचा वर्षाव! MCA कडून तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस जाहीर

Mumbai Cricket Association: इराणी कप चॅम्पियन्स मुंबई संघासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.
Irani Cup: इराणी कप चॅम्पियन्स मुंबई संघावर पैशांचा वर्षाव! MCA कडून तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस जाहीर
mumbai cricket associationtwitter
Published On

Mumbai Cricket Association: देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा दबदबा पाहायला मिळाला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने रणजी ट्रॉफी २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली होती. तसेच नुकताच पार पडलेल्या इराणी कप स्पर्धेत मुंबईने रेस्ट ऑफ इंडियाला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली. ही शानदार कामगिरी पाहता मुंबई क्रिकेट असोसिएशनने इराणी कप विजेत्या मुंबई संघासाठी १ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे.

इराणी कप विजेत्या खेळाडूंचा सन्मान

मुंबईतील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ऑफीसमध्ये इराणी कप विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अक्ष्यक्ष अजिंक्य नाईक ट्रॉफीसोबत पोझ देताना दिसून आले. या कार्यक्रमाला मुंबईच्या विजेत्या संघातील खेळाडूंनी हजेरी लावली. यादरम्यान अजिंक्य रहाणे यांनी संघातील खेळाडूंसाठी १ कोटींच्या बक्षीसाची घोषणा केली.

Irani Cup: इराणी कप चॅम्पियन्स मुंबई संघावर पैशांचा वर्षाव! MCA कडून तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस जाहीर
IND vs BAN: बांगलादेशला धूळ चारताच टीम इंडियाने रचला इतिहास! १७ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

२७ वर्षांनंतर जिंकला इराणी कप

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई संघाने रणजी ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. ही स्पर्धा जिंकल्यानंतर इराणी कपचा सामना मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबईने रेस्ट ऑफ इंडियावर एकतर्फी विजय मिळवला. हा मुंबईचा १९९७ नंतर पहिलाच विजय ठरला आहे. हा सामना जिंकून मुंबईने २७ वर्षांची पराभवाची मालिका खंडीत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.

Irani Cup: इराणी कप चॅम्पियन्स मुंबई संघावर पैशांचा वर्षाव! MCA कडून तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस जाहीर
IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद; अश्विन, बुमराह आणि नेहरालाही सोडलं मागे

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर रेस्ट ऑफ इंडियाने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईने ५३७ धावांचा डोंगर उभारला. मुंबईकडून सरफराज खानने नाबाद २२२ धावांची खेळी केली.

या धावांच्या प्रत्युत्तरात रेस्ट ऑफ इंडियाकडून फलंदाजीसाठी आलेल्या अभिमन्यू ईश्वरनने १८१ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ४१६ धावांवर पोहोचवली. मुंबईने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मुंबईने ३२९ धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या बळावर मुंबईने हा सामना आपल्या नावावर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com