सामना सुरू होण्याआधी पाक राष्ट्रगीताऐवजी ‘DJ वाला बाबू’ वाजलं.
सोशल मीडियावर या घटनेची मोठी चर्चा झाली.
भारताने पाकिस्तानला केवळ १२७ धावांत गारद केलं.
विजयामुळे भारतीय खेळाडूंमध्ये व चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण.
ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० आशिया चषक स्पर्धेतील सामना रंगला. कोणत्याही मॅच आधी परंपरेनुसार, दोन्ही संघांतील खेळाडू राष्ट्रगीतासाठी उभे राहिले. यावेळी पाकिस्तानच्या राष्ट्रगीता ऐवजी 'DJ वाला बाबू' हे गाणं वाजल्याने कालची मॅच चर्चेचा विषय ठरला.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं. त्यानंतर भारताने पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. काल दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना चांगलाच रंगला. यावेळेस पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामना सुरु होण्यापूर्वी परंपरेनुसार दोन्ही देशाचे राष्ट्रगीत वाजते. पाकिस्तानच्या राष्ट्रगीतादरम्यान राष्ट्रगीत न लागता 'dj वाले बाबू' हे गाणं वाजलं.
ही चूक तात्काळ सुधारण्यात आली. पण उपस्थित पाकिस्तानी खेळाडूंसह सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी देखील भुवया उंचावल्या. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. शिवाय या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या कृतीने सुद्धा भारतीयांचं लक्ष वेधलं.
दरम्यान या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दारुण पराभव केला. सुरुवातीला दोन ओवरमध्ये दोन विकेट काढून भारतीय खेळाडूंनी मैदान काबीज केलं. आणि संपूर्ण टीमला भारताने १२७ रन्समध्ये गारद केलं. या विजयानंतर भारतीय खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. तसेच विजय मिळाल्याबद्दल देशभरातून भारतीय खेळाडूंची पाठ कौतूकाने थोपटली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.