Border-Gavaskar Trophy : ...तरीही टीम इंडिया WTC च्या फायनलमध्ये धडकणार, जाणून घ्या समीकरण!

India Vs Australia : सध्या ऑस्ट्रेलिया संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.
Border-Gavaskar Trophy, India vs Australia News Update
Border-Gavaskar Trophy, India vs Australia News UpdateSaam TV

ICC World Test Championship : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू व्हायला केवळ २ दिवस शिल्लक राहिले आहेत. या मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

कारण भारतीय संघाला (Team India) जर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचा असेल तर ही मालिका जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. मात्र भारतीय संघ जर या मालिकेत पराभूत झाला, तरीदेखील भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो. समजून घ्या कसे असेल अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे समीकरण.

Border-Gavaskar Trophy, India vs Australia News Update
Ind Vs Aus Series: कुंकवाचा टिळा लावताना केली 'अशी' कृती; सिराज,उमरान मलिकचा Video पाहून संतापले नेटकरी

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) हे दोन्ही संघ ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमने-सामने येणार आहेत. भारतीय संघाने जर ही मालिका ४-० ने जिंकली तर, भारतीय संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.

तसेच मालिका अटीतटीची झाली आणि भारतीय संघाने एखादा सामना गमावला तरी देखील भारतीय संघ ३-१ ने अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरू शकतो. तसेच मालिकेतील एखादा सामना बरोबरीत सुटल्यास भारतीय संघ ३-० ने देखील अंतिम फेरीत दाखल होऊ शकतो. (Sports News)

Border-Gavaskar Trophy, India vs Australia News Update
Ind Vs Aus Test Series: ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटा! 'या' घातक गोलंदाजाची भारतीय संघात एन्ट्री

मात्र भारतीय संघ जर ही मालिका ३-० ने आपल्या नावावर करण्यास अपयशी ठरला तर भारतीय संघाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. असे झाल्यास भारतीय संघाला, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

न्यूझीलंड संघाने श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतील एक सामना जिंकला किंवा सामना ड्रॉ केला तरी देखील भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरू शकतो.

भारताने बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी गमावली तर कसे असेल समीकरण?

भारतीय संघाने बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी मालिका गमावली तर भारतीय संघाच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. भारतीय संघाला केवळ श्रीलंका आणि न्यूझीलंड नव्हे तर वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या मालिकेच्या निकालावर आवलंबून राहावं लागणार आहे.

भारतीय संघाने ही मालिका २-१ ने गमावल्यास वेस्टइंडीज संघाला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध एक सामना जिंकावा लागेल किंवा ड्रॉ करावा लागेल. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाला श्रीलंका संघाविरुद्ध कमीत कमी एक कसोटी सामना जिंकावा लागेल. सध्या ऑस्ट्रेलिया संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com