

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. परंतु दाट धुक्यामुळे नाणेफेक होऊ शकली नाही. बराच वेळ हवामान सुधारण्याची प्रतिक्षा करण्यात आली. पण रात्रीचे १० वाजपर्यंत हवामानात कोणतीच सुधारणा न झाल्यानं अखेर सामना रद्द करण्यात आला.
सामन्याची नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होणार होती. पण दाट धुक्यामुळे नाणेफकीला उशीर झाला. त्यानंतर सामना ९:३० वाजता पुन्हा आयोजित करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला परंतु धुके वाढतच गेले. दरम्यान हवामानात सुधारणा झाली का नाही खेळ खेळण्यास वातावरण चांगले आहे का हे जाणून घेण्यासाठी अंपायर सहा वेळा मैदानावर आले. त्यांच्यासोबत राजीव शुक्लाही आले. पण ३:३० तास प्रतिक्षा केल्यानंतरही सामना सुरू होऊ शकला नाही. टीम इंडिया मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. अहमदाबादमधील सामना आता मालिकेसाठी महत्त्वाचा असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.