
दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशने भारतीय संघासमोर २२९ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान फार मोठं नव्हतं. या धावांचा पाठलाग करताना रोहित आणि गिलने दमदार सुरुवात करुन दिली. रोहित माघारी परतला, पण गिलने शेवटपर्यंत किल्ला लढवत भारतीय संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २२८ धावा केल्या. भारतीय संघाचा पॉवरपॅक फलंदाजीक्रम पाहिला, तर हे आव्हान फार मोठं नव्हतं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली.
दोघांनी मिळून भारताला ताबडतोड सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. मात्र रोहित शर्मा ४१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला. विराट कोहलीकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराट नको तो शॉट खेळून २२ धावांवर माघारी परतला. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी आला. मात्र श्रेयसला या संधीचा फायदा घेता आला नाही. श्रेयस १५ धावांवर माघारी परतला.
लेफ्टी- रायटी कॉम्बिनेशन म्हणून अक्षर पटेल फलंदाजीला आला. मात्र अक्षर पटेललाही मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. भारतीय संघाला १४४ धावांवर चौथा धक्का बसला. त्यानंतर गिल आणि राहुलने महत्वपूरिण भागीदारी करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशने ४९.४ षटकात २२८ धावा केल्या. बांगलादेशकडून फलंदाजी करताना तोहिद हृदोयने सर्वाधिक १०० धावांची खेळी केली. तर जाकेर अलीने ६८ धावा चोपल्या. या दोघांनी मिळून १५४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर बांगलादेशने २०० धावांचा पल्ला गाठला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.