IND vs BAN, 2nd T2OI: टीम इंडियाच्या विजयाची सप्तमी! बांगलादेशला नमवत मालिकेत घेतली २-० ची विजयी आघाडी

India vs Bangladesh 2nd T20I: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये दुसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे.
IND vs BAN, 2nd T2OI: टीम इंडियाच्या विजयाची सप्तमी! बांगलादेशला नमवत मालिकेत घेतली २-० ची विजयी आघाडी
Team indiatwitter
Published On

India vs Bangladesh, 2nd T20I: भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. छोटी बाऊंड्री असलेल्या दिल्लीच्या मैदानावर भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत २२१ धावांपर्यंत मजल मारली.

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी २२२ धावांची गरज होती. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला .. धावा करता आल्या आहेत. भारतीय संघाने हा सामना ८६ धावांनी जिंकून टी -२० मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने केल्या २२१ धावा

या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसले. सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवलाही मोठी खेळी करता आली नाही.

IND vs BAN, 2nd T2OI: टीम इंडियाच्या विजयाची सप्तमी! बांगलादेशला नमवत मालिकेत घेतली २-० ची विजयी आघाडी
IND vs BAN: 'आम्ही नाही घाबरत, त्याच्यासारखे आमच्या नेट्समध्ये...' मयांक यादवबद्दल हे काय म्हणाला बांगलादेशचा कर्णधार

बांगलादेशने इथपर्यंत पकड बनवून ठेवली होती. मात्र त्यानंतर रिंकू सिंह आणि नितीश कुमार रेड्डीची जोडी जमली. दोघांनी मिळून बांगलादेशच्या गोलंदाजांना धू धू धुतलं. दोघांनी मिळून अर्धशतकी खेळी केली.

आपला दुसराच सामना खेळत असलेल्या नितीशने ७ षटकारांच्या साहाय्याने ७४ धावांची शानदार खेळी केली. नितीश बाद झाल्यानंतर रिंकू सिंगने मोर्चा सांभाळला. त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत अर्धशतक झळकावलं. शेवटी उरलेलं काम हार्दिक पंड्या आणि रियान परागने पूर्ण केलं. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या २२१ धावांपर्यंत पोहोचवली.

IND vs BAN, 2nd T2OI: टीम इंडियाच्या विजयाची सप्तमी! बांगलादेशला नमवत मालिकेत घेतली २-० ची विजयी आघाडी
IND vs BAN: केव्हा, कुठे अन् कधी पाहता येणार दुसरा सामना? पाहा एकाच क्लिकवर

भारतीय संघ २-० ने आघाडीवर

या शानदार विजयासह भारतीय संघाने टी -२० मालिकेत २-० ने विजय आघाडी घेतली आहे. यापूर्वी ग्वालियरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. आता दुसरा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकाही खिशात घातली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com