IND vs AUS: जयस्वालची एकाकी झुंज 'अयशस्वी',भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव, WTC Final हातून जाणार?

India vs Australia 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला १८४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IND vs AUS: जयस्वालची एकाकी झुंज 'अयशस्वी',भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव, WTC Final हातून जाणार?
team indiatwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी ३४० धावा करायच्या होत्या. मात्र या सामन्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या १५५ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाला १८४ धावांनी गमवावा लागला आहे.

IND vs AUS: जयस्वालची एकाकी झुंज 'अयशस्वी',भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव, WTC Final हातून जाणार?
IND vs AUS: बॅटिंगनंतर आता बॉलिंगमध्येही हेड नडला! पंतची विकेट ते आगळं वेगळं सेलिब्रेशन का केलं? जाणून घ्या कारण

या सामन्यातील शेवटच्या दिवशी भारतीय संघाला ३४० धावांचा डोंगर सर करायचा होता. मात्र भारतीय फलंदाज सामना ड्रॉ करण्यासाठी मैदानात उतरले होते. या सामन्यातही भारतीय फलंदाजांचा सुपरफ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. पाचव्या दिवशी दुसऱ्या सेशनपर्यंत भारताचे केवळ ३ फलंदाज माघारी परतले होते.

शेवटच्या सेशनमध्ये भारतीय संघाला ३८ षटकं खेळून काढायची होती आणि ७ फलंदाज शिल्लक होते. मात्र अवघ्या २५ षटकात भारतीय संघाचा डाव आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला हातचा सामना गमवावा लागला आहे.

यशस्वी जयस्वालची एकाकी झुंज

या सामन्यातही भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली होती. दोघांनीही सावध सुरुवात केली. मात्र २५ धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का बसला.

IND vs AUS: जयस्वालची एकाकी झुंज 'अयशस्वी',भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव, WTC Final हातून जाणार?
IND vs AUS: बॉक्सिंग डे कसोटी ड्रॉ झाल्यास टीम इंडियासाठी कसं असेल WTC Final मध्ये जाण्याचं समीकरण?

रोहित शर्मा अवघ्या ३ धावांवर माघारी परतला. रोहित पाठोपाठ राहुल शून्यावर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली ५, रिषभ पंत ३०, रविंद्र जडेजा २, नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप ७, जसप्रीत बुमराह ० आणि मोहम्मद सिराज शून्यावर माघारी परतले. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदर ५ धावांवर नाबाद राहिला.

IND vs AUS: जयस्वालची एकाकी झुंज 'अयशस्वी',भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव, WTC Final हातून जाणार?
IND vs AUS: 1 ओव्हर,0 रन अन् 2 विकेट; अवघ्या 5 मिनिटात असा फिरला सामना

ऑस्ट्रेलियाकडे २-१ ची आघाडी

या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार कमबॅक कलं आणि भारतीय संघाला १० गडी राखून पराभूत केलं. मालिकेतील तिसरा सामना ड्रॉ राहिला होता. चौथ्या कसोटीतही भारतीय संघाला ड्रॉ करण्याची संधी होती. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारत २-१ ने आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com