
नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी परभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दिड दिवसात धुव्वा उडवला. दरम्यान या खेळपट्टीची दखल घेत आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.
केपटाऊनच्या पिचला आयसीसीकडून डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे. हा निर्णय आयसीसी पिच आणि आउटफिल्ड मॉनिटरिंग प्रोसेसच्या अतंर्गत घेण्यात आला आहे. हा कसोटी सामना ऐतिहासिक ठरला आहे.
कारण या सामन्याचा निकाल अवघ्या दिड दिवसात लागला आहे. हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात छोटा सामना ठरला आहे. या सामन्यात १०७ षटकं म्हणजे केवळ ६४२ चेंडू टाकण्यात आले. या कसोटीत भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. या विजयासह भारतीय संघाने ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त केली होती. (Latest sports updates)
आयसीसीचे रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी या पिचचा रिपोर्ट दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं कठीण होतं. संपूर्ण सामन्यात फलंदाजी करताना चेंडू वेगाने आणि उसळी घेऊन येत होता. त्यामुळे फलंदाजांना शॉट खेळणं कठीण होत होतं. अनेकदा चेंडू फलंदाजाच्या ग्लोव्हला जाऊन लागत होता.त्यामुळे फलंदाज बादही झाले.'
आयसीसी पिच आणि आउटफिल्ड मॉनिटरिंग प्रोसेसच्या अतंर्गत जी पिच खेळण्यासाठी अनुकूल नसल्याचं आढळून येतं अशा पिच आयसीसीकडून डिमेरीट पॉईंट दिला जातो. दरम्यान एखाद्या मैदानाच्या डिमेरीटची संख्या ६ वर जाऊन पोहोचली तर अशा मैदानावर पुढील १ वर्ष कुठलाही आतंरराष्ट्रीय सामना खेळवला जात नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.