Rohit- Hardik Controversy: हार्दिक अन् रोहित यांच्यातील वाद कसा मिटला? दिग्गजाने सांगितली Inside Story

Rohit Sharma -Hardik Pandya Controversy: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यातील वाद कसा मिटला? जाणून घ्या.
Rohit- Hardik Controversy: हार्दिक अन् रोहित यांच्यातील वाद कसा मिटला? दिग्गजाने सांगितली Inside Story
rohit sahrma hardik pandyayandex
Published On

आयपीएल २०२४ स्पर्धेदरम्यान रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यात मतभेद असल्याची जोरदार चर्चा रंगली. मात्र आयपीएल झाल्यानंतर दोन्ही खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकत्र खेळताना दिसून आले.

या स्पर्धेत दोघांनी मिळून शानदार कामगिरी केली आणि भारताला वर्ल्डकपही जिंकून दिला. दरम्यान दोघांमधील वाद कसा मिटला, याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Rohit- Hardik Controversy: हार्दिक अन् रोहित यांच्यातील वाद कसा मिटला? दिग्गजाने सांगितली Inside Story
Rohit Sharma: ना लखनऊ, ना दिल्ली; रोहित या संघाकडून खेळणार? दिग्गज खेळाडूने दिली हिंट

एका पॉडकास्टमध्ये बोलताना पत्रकार विमल कुमार यांनी रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यातील वाद कसे मिटले याबाबत खुलासा केला आहे. यूएसएमध्ये ज्यावेळी भारतीय संघाचा सराव सुरु होता. त्यावेळी विमल कुमारही तिथे उपस्थित होते. दोघांनी दिर्घकाळ चर्चा करुन वाद मिटवला, असं विमल कुमार यांनी सांगितलं.

Rohit- Hardik Controversy: हार्दिक अन् रोहित यांच्यातील वाद कसा मिटला? दिग्गजाने सांगितली Inside Story
Rohit Sharma Record: रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी! या मोठ्या रेकॉर्डमध्ये दिग्गज कर्णधाराला सोडणार मागे

विमल कुमार यांनी सांगितले की,' जेव्हा मी नेट्सजवळ गेलो, तेव्हा मी पाहिलं की दोघांमध्ये काहीच चर्चा सुरु नव्हती. पहिल्या दिवशी त्यांनी एकमेकांशी काहीच चर्चा केली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी मी पाहिलं की, ते दोघे आले आणि एकमेकांपासून दिर्घकाळ चर्चा केली. जिथे ते लोकं बसून गप्पा मारत होते, तिथे कुठलाही कॅमेरा नव्हता. ज्याप्रकारे ते लोकं चर्चा करत होते, ते पाहून मलाही प्रश्न पडला होता की, मी हे काय पाहतोय?'

Rohit- Hardik Controversy: हार्दिक अन् रोहित यांच्यातील वाद कसा मिटला? दिग्गजाने सांगितली Inside Story
Rohit Sharma, IPL 2025: रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला रामराम करणार? हे 2 संघ 50 कोटी द्यायला तयार

'त्यानंतर हार्दिकने पुढील ३ दिवस सोबत गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव केला. ज्यावेळी मी संघातील वातावरण पाहिलं, त्यावरुन मला तरी वाटत होतं की, आता सर्व सुरळीत आहे. शेवटी काय झालं हे संपूर्ण जगाने पाहिलं.' असं विमल कुमार म्हणाले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. तर सामन्यातील निर्णायक षटक हार्दिक पंड्यानेच टाकलं होतं.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com