Govatsa dwadashi 2022: गोवत्स द्वादशी म्हणजे काय? दिवाळीच्या कोणत्या दिवशी साजरी केली जाते?

दिवाळीच्या सुरुवातीला येणारा हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.
Govatsa dwadashi 2022
Govatsa dwadashi 2022Saam Tv
Published On

Govatsa dwadashi 2022 : दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आहे. या काळात सर्वत्र रोषणाई, दिव्यांची आरास, रांगोळीचे रंग व फराळाचा सुंगध दरवळत असतो. दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

यंदा वसुबारस हा २१ ऑक्टोबरला आहे. यादिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

Govatsa dwadashi 2022
Diwali 2022 : धनतेरसपासून ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी आहे खास, 'या' ५ दिवासांचे महत्त्व व पूजा विधी जाणून घ्या

वसुबारस कधी साजरा केला जातो ?

वसुबारस हा दिवाळी (Diwali) सुरु होण्याच्या एक दिवसाआधी, म्हणजे धनत्रयोदशीच्या अदल्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू पंचागानुसार वसुबारस हा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस गाय आणि तिच्या वासराचा सन्मान, पूजा करण्यासाठी ओळखला जातो. 'वसु' म्हणजे गाय आणि 'बारस' म्हणजे बारावा दिवस, म्हणून वसु बारस हा शब्द आहे.

हा उत्सव महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये व दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. गुजरातमध्ये याला 'बाग बारस' म्हणतात आणि दक्षिण भारतात लोक 'नंदिनी व्रत' म्हणून हा दिवस साजरा करतात.

Govatsa dwadashi 2022
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने का खरेदी केले जाते? जाणून घ्या, त्यामागची कथा

वसुबारसचे महत्त्व

समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण होण्यासाठी वासरासहित गायीची पूजा केली जाते.

वसुबारसला काय केले जाते ?

या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य (Health) मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com