
1948, 1965, 1971 आणि 1999 चं कारगील या चार युद्धात सपाटून मार खाल्ल्यानंतरही पाकड्यांची युद्धाची खुमखुमी गेली नाही.. त्यातच आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाय.. त्या पार्श्वभुमीवर पाकड्यांकडून युद्धाची वल्गना केल्या जात आहेत..
मात्र पाकिस्तान खड्ड्यात जात असताना पाकड्यांना युद्धाची खुमखुमी का आहे? पाहूयात..
पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर प्रांतामध्ये विद्रोह
धार्मिक धृवीकरणासाठी युद्धातून एकता निर्माण करण्याचा प्रयत्न
पाकिस्तान लष्कराची घटत चाललेली लोकप्रियता
पाकिस्तानची गडगडलेली अर्थव्यवस्था
इम्रान खानच्या अटकेवरुन जनतेत असलेली नाराजी
जनतेचं लक्ष मुलभूत प्रश्नावरुन हटवण्यासाठी
1971 प्रमाणेच आताही पाकिस्तानातील खैबर प्रांतात आणि बलुचिस्तानमध्ये लष्कराला टार्गेट केलं जातंय.. त्यातच पाकड्यांच्या लष्कराची लोकप्रियता गाळात गेलीय. त्यामुळे लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि देशातील विद्रोह शांत करुन देश एकजूट ठेवण्यासाठी पाकिस्तान युद्धाची भाषा करत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय..
कोणत्याही देशात युद्ध भडकल्यानंतर तेथील जनता सगळे मतभेद विसरुन देशासाठी उभे राहते. त्यामुळे आता युद्धाच्या नावाखाली देशाच्या एकीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतोय.. कारण युद्ध भडकल्यास आंतरराष्ट्रीय समुदायाकडून विनाश होण्यापुर्वी युद्ध रोखलं जाण्याचा अंदाज आहे... त्यामुळेच पाकडे युद्धासाठी उड्या मारत आहेत...मात्र पाकड्यांनी युद्ध छेडल्यास 1971 मध्ये पाकिस्तानचे जसे 2 भाग केले तसे आता उरलेल्या पाकिस्तानचे तीन तुकडे करुन पाकड्यांना धडा शिकवायला हवा..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.