PM Narendra Modi: 'राष्ट्र' ही कल्पना असंवैधानिक, तर तुमच्या पक्षाला 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस' का म्हणतात? - मोदी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर अनेक आरोप केले.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Saam Tv
Published On

नवी दिल्ली: काँग्रेस (Congress) सत्तेत असताना त्यांनी देशाचा विकास होऊ दिला नाही. आता जेव्हा ते विरोधी पक्षात आहेत तेव्हा ते देशाच्या विकासात अडथळा निर्माण करत आहेत, असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यसभेत काँग्रेसवर अनेक आरोप केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Lok Sabha speech) यांनी उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

PM Narendra Modi
PM Narendra Modi: कोरोना काळात 80 कोटी नागरिकांना मोफत राशन, गरिबांसाठी विक्रमी घरे : पंतप्रधान

तुमची नवीन संकल्पना असेल तर काँग्रेसचं नाव बदला - मोदी

काँग्रेस (Congress) सत्तेत असताना त्यांनी देशाचा विकास होऊ दिला नाही. आता जेव्हा ते विरोधी पक्षात आहेत तेव्हा ते देशाच्या विकासात अडथळा निर्माण करत आहेत. आता काँग्रेसला राष्ट्र या संकल्पनेवरही आपत्ती आहे. 'राष्ट्र' ही कल्पना असंवैधानिक आहे, तर तुमच्या पक्षाचं नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष का ठेवलं आहे. जर तुमची नवीन संकल्पना असेल तर नाव बदला. आपल्या पुर्वजांची चूक सुधारा, असं म्हणत मोदींनी (PM Narendra Modi) काँग्रेसवर जहरी टीका केली. यानंतर सभागृहात एकच गोंधळ माजला.

PM Narendra Modi
PM Narendra Modi: काँग्रेस नसती तर शीखांची कत्तल झाली नसती, काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडावं लागलं नसतं - मोदी

काँग्रेसने कुटुंबवादापुढे काहीही विचार केला नाही - मोदी

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, काही लोक 1947 देश निर्माण झाला असं मानतात. लोकशाही कुणाच्या मेहरबानीवर नाही. 1975 ला लोकशाही गळा घोटण्याचा काम केलं गेलं. भारत ही लोकशाहीची जननी आहे हे अभिमानाने सांगण्याची गरज होती. लोकशाही देशात वर्षानुवर्षे सुरु आहे. भारतात शतकानुशतके लोकशाही आणि वादविवाद सुरु आहेत.

काँग्रेसची अडचण ही आहे की त्यांनी कुटुंबवादापुढे काहीही विचार केला नाही. भारताच्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका कुटुंबाभिमुख पक्षांपासून आहे, हे मानावे लागेल. यामध्ये पहिला धोका हा प्रतिभेला आहे.

काँग्रेस नसती तर काय झालं असतं?

तसेच, पंतप्रधानांनी काँग्रेस नसती तर काय काय झालं नसतं याचा पाढाही राज्य सभेत वाचला. काँग्रेस नसती तर आज लोकशाही कुटुंबवादापासून मुक्त असाता, आणीबाणीचा कलंक नसता, शीखांचा नरसंहार झाला नसता, वर्षानुवर्षे पंजाब दहशतीखाली नसता, जम्मू-काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडावं लागलं नसतं, असे गंभीर आरोपही पंतप्रधानांनी केले.

आता पीएम मोदींनी एवढा मोठा आरोप केल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे चांगलेच संतापले आणि काही काळ पंतप्रधानांना आपले भाषण थांबवावे लागले. पण, पंतप्रधानांनी सुरूवातीला म्हटले की महात्मा गांधींनाही काँग्रेस नको होती.

पंतप्रधानांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या निषेधाला सडेतोड उत्तर दिले. लोकशाहीत फक्त बोलले जात नाही, तर ऐकण्याची क्षमताही असली पाहिजे, असे ते म्हणाले. यानंतर आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर देशातील अनेक राज्ये अस्थिर केल्याचा आरोपही केला.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com