रांचीतील झखराटांड मुंडाटोली भागात गोळीबाराची घटना.
जमीन व्यापारी रवी कुमार ठार, बलमा गंभीर जखमी.
पोलिसांनी मास्टरमाईंड कुणाल कुमारसह सहा जणांना अटक केली.
आठ महिन्यांपूर्वीपासूनच या हत्येचा कट रचल्याचं पोलिस तपासात समोर आलं.
झारखंडच्या रांचीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गुन्हेगारांनी जमीन खरेदी विक्री व्यापारी रवी कुमार यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. रवि कुमार यांच्या साथीदारालाही गोळ्या झाडून जखमी केलं. जखमीची प्रकृती चिंताजनक असून, रविवारी सायंकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींना अटक केली.
ही घटना रांचीतील रातू परिसरातील झखराटांड मुंडाटोली येथे घडली. रवी कुमार हे हजारीबागमधील केरेदारी भागातील रहिवासी होते. पोलिसांच्या माहितीनुसार, जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी मास्टरमाईंड कुणाल कुमार याला त्याचे दोन साथीदार बबलू गोप आणि लालमोहन कुमार यांच्यासह अटक केली. रवी कुमार यांची हत्या करण्यासाठी कुणालने तिघा शूटरना बोलावलं होतं.
पोलिसांनी तपासादरम्यान या प्रकरणी वापरण्यात आलेल्या बंदुकी जप्त केल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी रवी कुमार आणि त्यांचा साथीदार दारू पित असताना आरोपी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोळीबार केला. यात रवी कुमार जागीच ठार झाले, तर त्यांचा साथीदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रवी कुमार आणि बलमा यांच्या हत्येचा कट आठ महिन्यांपूर्वी रचण्यात आला होता. त्यावेळी बलमा आणि आरोपी कुणालच्या वडिलांमध्ये वाद होऊन मारहाण झाली होती. याशिवाय, १० हजार रुपयांच्या उधारीवरूनही बलमा आणि कुणाल यांच्यात वाद झाला होता. जुन्या वैमनस्य आणि या वादातूनच रवी कुमार यांच्या हत्येचा बदला घेण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.