India Vs Pakistan : पाकिस्तानला 'सोंग' महागात पडलं; काश्मीर मुद्द्यावरून भारताच्या रणरागिणीनं अख्ख्या जगासमोर झापलं

India- Pakistan On Kashmir: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) काश्मीर मुद्द्यावरून राग आळवण्याचं पाकिस्तानचं 'सोंग' भारतानं उघडं पाडलं आहे.
India UN Ambassador Ruchira Kamboj
India UN Ambassador Ruchira KambojSAAM TV

India- Pakistan On Kashmir: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) काश्मीर मुद्द्यावरून राग आळवण्याचं पाकिस्तानचं 'सोंग' भारतानं उघडं पाडलं आहे. 'महिला, शांती आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर आयोजित चर्चासत्रात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केला. त्यावर भारतानं पाकिस्तानला झापलं. पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्याची आवश्यकता नाही, असं भारतानं ठणकावून सांगितलं.

पाकिस्तानचे (Pakistan) परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी काश्मीर मुद्द्यावर टिप्पणी केली. त्याला प्रत्युत्तर देताना भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी झापलं. भुट्टो यांचे निवेदन हे तथ्यहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे कंबोज म्हणाल्या.

India UN Ambassador Ruchira Kamboj
Tamil Nadu : भाजपला मोठा झटका; 13 नेत्यांनी पक्ष सोडला

कंबोज म्हणाल्या, की 'माझे भाषण संपवण्यापूर्वी मी केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरसंदर्भात (Jammu-Kashmir) पाकिस्तानच्या प्रतिनिधींद्वारे तथ्यहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित टिप्पणीचे खंडन करते. अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराला उत्तरं देणं मला योग्य वाटत नाही.'

India UN Ambassador Ruchira Kamboj
NCP: मोठी बातमी! शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत; नागालँडमध्ये भाजपाप्रणित सरकारला पाठिंबा

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) महिला, शांती आणि सुरक्षा या विषयावरील चर्चासत्रात रुचिरा कंबोज म्हणाल्या की, आमचं लक्ष सकारात्मक आणि पुढचा विचार करणारं हवं. आजची चर्चा ही महिला, शांती आणि सुरक्षेचा अजेंडा पूर्णपणे लागू करण्यासाठी आमच्या सामूहिक प्रयत्नांना आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आम्ही चर्चेतील मुद्द्याचा पूर्णपणे आदर करत आहोत.

पाकिस्तानची वारंवार फजिती

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त यूएनएससीमध्ये अध्यक्ष मोझाम्बिक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चासत्रादरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर केलेल्या टिप्पणीनंतर रुचिरा कंबोज यांनी ही तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानकडून अशाच पद्धतीने अन्य विषयांवरील चर्चासत्रांत काश्मीर मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्या-त्या वेळी त्यांची फजिती होतेय. अलीकडेच पाकिस्तानच्या मंत्री हिना रब्बानी खार यांनीही काश्मीर मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी भारतीय प्रतिनिधींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com