हरदोई : उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात बुधवारी भीषण रस्ते अपघात झाला आहे. मल्लावा पोलीस स्टेशन हद्दीत घराबाहेर झोपलेल्या कुटुंबावर रेतीने भरलेला ट्रक उलटून ८ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाळूने भरलेला ट्रक कुटुंबावर उलटल्याने एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला. यानंतर परिसरात शेजारी राहणाऱ्या लोकांची धावाधाव झाली. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच रेस्कू ऑपरेशन सुरु केलं आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पोलिसांनी जेसीबी आणि हायड्राच्या मदतीने ट्रक खाली दबलेल्या ८ जणांना बाहेर काढलं.
मल्लावा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कटरा विल्हौर मार्गावर झोपडी बांधून राहणाऱ्या काही कुटुंब राहत होते. मंगळवारची रात्र त्यांची अखेरची ठरली. मंगळवारी रात्री त्यांनी घरी एकत्र जेवण केलं. त्यानंतर सर्व घराबाहेर झोपण्यासाठी गेले. याच कुटुंबावर वाळूचा ट्रक उलटला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं आहे. या अपघाताच फक्त एका चिमुकलीचा जीव वाचला आहे. या जखमी चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. भीषण अपघाताचा आवाज आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रकखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेतील मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रॉडने भरलेला ट्रक दुभाजकाला जाऊन आदळला. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी सकाळच्या सुमारास रॉडने भरलेला ट्रक दुभाजकावर आदळल्याने भीषण अपघात झाला. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला आदळताच केबिनची काच फुटली. या अपघातातील ट्रक चालकाला रुग्णालयात नेले, मात्र, त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.