लग्न सराईचे दिवस आता सुरू झालेत. लग्नाळू लोक गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याच्या दिवसाची वाट पाहत आहेत. पण याचदरम्यान काही फसवणुकीच्या घटना देखील घडत असतात. लग्नाच्या नावाने काही गंडा घालत असतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे घडला. हा प्रकार ऐकल्यानंतर तुम्हीही नवरदेवाप्रमाणे डोक्याला हात माराल. त्याचं झालं असं, एका मुलीचं लग्न मोजून १२ दिवसात जमलं.
मुलीने आनंदाने लग्न केलं. मधुचंद्राच्या रात्री वेगळाच प्रकार समोर आल्यानंतर नवरदेवाला डोक्याला हात मारावा लागला. लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री नवरदेव जेव्हा तिच्या जवळ गेला आणि डोक्यावरील पदर बाजुला केला तेव्हा त्याच्या मोठा धक्का बसला. नवरी मुलीने फक्त फोटोशूटसाठी लग्न केल्याची गोष्ट माहिती झाल्यानंतर नवरदेवाच्या पायाखालील जमीन सरकली.
शहरातील एका मुलीने नवरीच्या कपड्यांमध्ये फोटो काढण्याची इच्छा होती. त्यासाठी तिने थेट लग्नाचा घाट घातला. त्यासाठी तिने कुटुबीयांना आपल्याला लग्न करायचं असल्याचं सांगितलं. तिच्या इच्छेनुसार घरच्यांनी वराचा शोध सुरू केला.
नशिबाने एका चांगला वर देखील त्यांना मिळाला. लग्नाची सर्व बोलणी झाल्यानंतर अवघ्या १२ दिवसात घरच्यांनी त्या दोघांच लग्न लावून दिलं. परंतु मुलीच्या मनात मात्र वेगळंच सत्र चालू होतं. नवरीच्या पाठवणीच्या कार्यक्रमापर्यंत तिने खूप फोटो काढले. त्यानंतर मधुचंद्राची वेळ आली तेव्हा नवरीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला. नवरदेव जेव्हा तिच्या जवळा आला त्यावेळी तिने आपण फक्त फोटो काढण्यासाठी लग्न केल्याचं सांगितलं.
त्यावेळी नवरदेवाच्या पायखालची जमीन सरकली. या मुलीला फोटो काढण्याचे इतके वेड होते की, तिने खरोखर लग्न केलं. घरातील सदस्यांनाही तिचा हेतू समजू शकला नाही आणि त्यांच्या सांगण्यावरून मुलीने 12 दिवसांपूर्वी त्याच शहरातील एका तरुणाशी घाईघाईने लग्न केले.
पाठवणी झाल्यानंतर सासरी आलेल्या मुलीचा फोटो काढण्याची हौस पूर्ण झाली होती. पहिल्या रात्री जेव्हा नवरदेव जेव्हा तिच्या जवळ आला आणि तिच्या डोक्यावरील पदर बाजुला करू लागला त्यावेळी तिने त्याचा हात पकडला. नवरदेवाला दूर सारत आपलं त्याच्यावर प्रेम नसल्याचं सांगितलं. आपण फक्त फोटोसाठी लग्न केलं असं जेव्हा सांगितलं त्यावेळी नवरदेवाला मोठा धक्का बसला. पती-पत्नीमध्ये सुरू असलेला वाद वाढला. त्यांचा आवाज घरातील इतर सदस्यांना ऐकू येऊ लागला. वधूने स्पष्टपणे सांगितले की तिला लगेच घटस्फोट हवाय.
स्वत:च्या या विश्वासघातामुळे नवरदेवाला मोठा धक्का बसला. शेवटी वधू संसार थाटण्यास राजी न झाल्याने पंचायत बोलावावी लागली.पंचायती बसल्यानंतर मोजून ४८ तासांतच थाटामाटात झालेले लग्न मोडले. हुंड्याच्या वस्तूंसह वधूला तिच्या घरी पाठवण्यात आले. नंतर काझी यांच्याशी चर्चा करून दोघांनी घटस्फोट घेतला. या प्रकरणी कोणत्याही पक्षाने पोलिस स्तरावर तक्रार दाखल केलेली नाही. तर शरियतनुसार हुंडा दिल्यानंतर नातेवाईकांकडून होणाऱ्या टीकेमुळे आणि प्रश्नांना कंटाळून वराने शहर सोडले आणि दिल्लीत एका नातेवाईकाच्या घरी गेलेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.