Heat Wave in India: हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप, बिहारमध्ये तीन दिवसात ४४ जणांचा मृत्यू; झारखंड, राजस्थानमध्येही उष्माघाताचे बळी

Deaths due to extreme heat: बिहारसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा कडाका पाहायला मिळत आहे. मागच्या 3 दिवसात बिहारमध्ये उष्माघाताने 44 जणांचा मृत्यू झाला असून झारखंड, राजस्थान, ओडिसामधेही उष्माघाताचे बळी ठरलेत.
 extreme heat Wave in India: हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप, बिहारमध्ये तीन दिवसात ४४ जणांचा मृत्यू; झारखंड, राजस्थानमध्येही उष्माघाताचे बळी
India Heat WaveYandex

गेल्या काही दिवसांपासून देशभरात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात वाढत असलेल्या उष्णतेचा सर्वात जास्त फटका बिहार राज्याला बसत असून उन्हामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागच्या 3 दिवसात बिहारमध्ये उष्माघाताने 44 जणांचा मृत्यू झाला असून झारखंड, राजस्थान, ओडिसामधेही उष्माघाताचे बळी ठरलेत.

उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. या वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका हा बिहार राज्याला बसल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये उष्माघाताने आत्तापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक जण आजारी पडलेत. वाढत्या उन्हामुळे उत्तर भारतातील 8 राज्यांना रेड अलर्ट जारी केलेला असून तापमान कालही 45 डिग्री सेल्सिअसच्या पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळाले.

बिहारप्रमाणे झारखंड, राजस्थान, ओडिसामधेही उष्माघाताने अनेकांचे बळी गेलेत. झारखंडमध्येही उष्माघाताच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. तसेच राजस्थानमध्ये गेल्या सात दिवसांत तिघांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यत ६१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या वाढत्या उन्हामुळे बिहारमध्ये शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 extreme heat Wave in India: हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप, बिहारमध्ये तीन दिवसात ४४ जणांचा मृत्यू; झारखंड, राजस्थानमध्येही उष्माघाताचे बळी
Jalgaon Crime: भुसावळ दुहेरी हत्याकांड: मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; अंदाधुंद गोळीबार करत केली माजी नगरसेवकाची हत्या

दरम्यान, येत्या काही दिवसांत बिहारच्या अनेक भागात उन्हाचा कडाका कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. औरंगाबाद (46.1 अंश सेल्सिअस), देहरी (46 अंश सेल्सिअस), गया (45.2 अंश सेल्सिअस), अरवाल (44.8 अंश सेल्सिअस) आणि भोजपूर (44.1 अंश सेल्सिअस) या ठिकाणी 44 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पाटणा येथे कमाल तापमान 40.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

 extreme heat Wave in India: हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप, बिहारमध्ये तीन दिवसात ४४ जणांचा मृत्यू; झारखंड, राजस्थानमध्येही उष्माघाताचे बळी
Prajwal Revanna : मोठी बातमी! प्रज्ज्वल रेवन्नाला बंगळुरू विमानतळावरून अटक; एसआयटी पथकाने ठोकल्या बेड्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com