

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने दिली प्रेमाची कबुली
नवरीने जबरदस्तीने लग्न लावल्याचा केला आरोप
दुसऱ्या दिवशी नवरी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली
उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात गोहांड गावात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरीने नवऱ्यासोबत नांदायला नकार दिला. त्यानंतर नवी नवरी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली. राठ पोलीस स्टेशनला पोहोचली. त्यानंतर पोलिसांना बॉयफ्रेंडसोबत राहायची इच्छा व्यक्त केली . यावेळी नातेवाईकांनी बळजबरी आणि मारहाण करून लग्न लावल्याचा आरोप नवरीने केला.
नवरीच्या आरोपानंतर गावात पोलिसांच्या उपस्थितीत पंचायत बसली. दोन्ही पक्षाच्या सहमतीने दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अवघे काही तास टिकलेलं लग्न कायद्याने रद्द झालं.
हमीरपूरच्या राठ हद्दीतील ही घटना आहे. बुद्ध सिंह यांची मुलगी मिथिलेश कुमारीचं लग्न गोहांड गावातील तरुणाशी झालं. नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री मिथिलेश कुमारी सासरी पोहोचली. बंद खोलीत नवरा-बायको होते. लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोने नवरा धरम सिंहला सिक्रेट सांगितलं.मिथिलेशने सांगितलं की, 'माझं दुसऱ्या तरुणाशी प्रेम आहे. लग्न माझ्या मर्जीविना झालं आहे' रात्री नवऱ्याला सिक्रेट सांगितल्यानंतर सकाळी बायको पोलीस स्टेशनला पोहोचली. या घटनेची गावात एकच चर्चा सुरू झाली.
नवरीच्या निर्णयाने नवरा धरम आणि कुटुंब सु्न्न झालं. नवऱ्याने म्हटलं की, नवरीला लग्न करण्याची इच्छा नव्हती. तर आधीच सांगायला पाहिजे होते. मला आधीच या गोष्टी सांगितल्या असत्या. तर माझ्या कुटुंबाला या बदनामीचा सामना करावा लागला नसता. या घटनेने सामाजाच नाचक्की झाल्याचेही त्याने सांगितले.
पोलिसांनी सांगितलं की, आम्ही नवरीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम राहिली. त्यामुळे दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. दोघे एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर नवरी तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली'.