भाजपसोबत आलो, आज आरपीआय कुठेच दिसत नाही; महायुतीत रामदास आठवले नाराज, म्हणाले...
Devendra Fadnavis and Ramdas AthawaleSaam Tv

Ramdas Athawale Upset: भाजपसोबत आलो, आज आरपीआय कुठेच दिसत नाही; रामदास आठवले नाराज, म्हणाले...

Ramdas Athawale On BJP : रामदास आठवले यांनी उघडपणे भाजपबद्दलची आपली नाराजी व्यक्त केली आहे, ते काय म्हणाले जाणून घ्या...
Published on

आम्ही 2012 मध्ये भाजपसोबत आलो. आज आरपीआय कुठे दिसत नाही, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

काय म्हणाले रामदास आठवले?

भाजपवर नाराजी व्यक्त करत रामदास आठवले म्हणाले की, ''मी आणि माझ्या पक्षातले अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. छोटा जरी पक्ष असला तरी आम्हला जागा हव्यात. मागे देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिलं होतं, ज्यात आम्हला किमान पाच जागा हव्यात, असं म्हटलं होतं. कार्यकर्ते नॉमिनेशनसाठी जाणार नाही, असे म्हणतात. 2012 मध्ये भाजपसोबत आलो. आज आरपीआय कुठे दिसत नाही, मी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.''

भाजपसोबत आलो, आज आरपीआय कुठेच दिसत नाही; महायुतीत रामदास आठवले नाराज, म्हणाले...
Sharad Pawar NCP 3rd Candidate List : परळीत शरद पवारांचे मराठा कार्ड, धनंजय मुंडे यांच्याविरोधात दिला तगडा उमेदवार; तिसऱ्या यादीत कोणाला संधी?

आठवले म्हणाले की, ''धारावी किंवा चेंबूरची जागा मिळावी, हा आमचा आग्रह आहे. महामंडळाची मागणी केली आहे. जिल्हापरिषद, महापालिका यासंदर्भात चर्चा झाली आहे. आरपीआयला डावलून चालणार नाही. आम्हाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे.''

ते म्हणाले, ''मी केंद्रात मत्री असल्याने इतर राज्यात देखील पक्षाच्या जागा वाढवतो. महायुतीत जागा मिळाल्या पाहिजे. मला वाईट वाटतंय, आम्ही सातत्याने महायुतीसोबत आहोत. नांदेडमधील जागा हवी होती, अनेक जागा हव्या होत्या, आम्ही 5-4 जागांची अपेक्षा ठेवली होती. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे, त्यात आमच्या मागण्या आहेत.

भाजपसोबत आलो, आज आरपीआय कुठेच दिसत नाही; महायुतीत रामदास आठवले नाराज, म्हणाले...
Ahmednagar Politics: ...म्हणून थोरातांच्या पायाखालची वाळू सरकली, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा निशाणा

'उद्धव ठाकरे यांनी महायुतीकडे परत यावं'

रामदास आठवले पुढे म्हणाले की, ''एक एमएलसी देखील आम्हाला हवी आहे. काँग्रेस पक्ष हा मजबूत करण्यापेक्षा तुम्हाला खिळखिळा करतो. उद्धव ठाकरे यांनी महायुतीकडे परत यावं. उद्धव ठाकरे हे महायुतीसोबत राहिले असते तर एकनाथ शिंदे फुटले नसते. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट निवडणुकीनंतर होऊ शकते.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com