नागरिकांनो पाणी जपून वापरा; मुंबईतील 'या' भागात दोन दिवस पाणीपुरवठा राहणार खंडित

एक ते दोन दिवस विक्रोळी कांजुर भांडुपमधील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
mumbai water news
mumbai water news saam tv
Published On

Mumbai News : मुंबईतील विक्रोळी, कांजुरमार्ग, भाडुंपकरांसाठी (Bhandup) पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची वृत्त समोर आलं आहे. भांडुपमधील संभाजी चौक परिसरामध्ये ९०० एम एम व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी (Water) वाया गेल्याची घटना घडली आहे. यामुळे एक ते दोन दिवस विक्रोळी, कांजुरमार्ग, भांडुपमधील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.

mumbai water news
Lumpy Virus : जालन्यात लम्पी आजाराचे थैमान, शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट रक्तानं लिहिलं पत्र

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपमधील सदर पाईपलाईन आतापर्यंत चौथ्यांदा फुटली आहे . महिनाभरापूर्वी सह्याद्री नगर परिसरात हीच पाईपलाईन फुटल्यामुळे तब्बल चार दिवस या परिसरामध्ये पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना चार दिवस पाण्याअभावीच काढावे लागले होते.मुंबई महापालिकेकडून सदर भांडुपमधील पाईपलाईन फुटल्यानंतर पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यावेळी पाणीपुरवठा किती दिवस खंडित राहील याची माहिती देखील नागरिकांना मिळाली नव्हती.

mumbai water news
मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; 'त्या' Viral ऑडियो क्लिपवर चंद्रकांत पाटलांचा मोठा सवाल

दरम्यान, त्याच ठिकाणी पुन्हा पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे परिसरातील नागरिक पुन्हा संतापले आहेत. दरम्यान, आजही पाईपलाईन फुटल्यानंतर संभाजी चौक परिसरात पाणी साचले होते. मात्र, पाणीपुरवठा खंडित केल्यानंतर या परिसरातील पाणी ओसरले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com