Navi Mumbai Water Cut
Navi Mumbai Water CutSaam Tv

Navi Mumbai Water Cut News: नवी मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन!

Navi Mumbai Latest News : नवी मुंबईतील काही भागांमध्ये येत्या 10 आणि 11 एप्रिल म्हणजेच सोमवार आणि मंगळवारी पाणी पुरवठा होणार नाहीये.

Navi Mumbai News: नवी मुंबईकरांसाठी (Navi Mumbai) ही बातमी खूपच महत्वाची बातमी आहे. ऐन उन्हाळ्यात नवी मुंबईकरांना (Navi Mumbaikar) पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबईतील काही भागांमध्ये येत्या 10 आणि 11 एप्रिल म्हणजेच सोमवार आणि मंगळवारी पाणी पुरवठा होणार नाहीये.

जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे नवी मुंबईत या दोन दिवस पाणीपुरवठा खंडीत (Water Cut) केला जाणार आहे. अशामध्ये नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Navi Mumbai Water Cut
Jitendra Awhad On Umesh Khade:...तर व्यथा मांडणाऱ्या प्रत्येकालाच अटक करा; रॅपर उमेश खाडे प्रकरणी जितेंद्र आव्हांडाचं ट्वीट चर्चेत

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाकरिता स्थलांतरीत करण्याचे काम केले जाणार आहे. कळंबोली येथे एक्स्प्रेस वे पुलाखाली दिवा-पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करुन जलवाहिनी टाकण्यासाठी आवश्यक ती कामं केली जाणार आहेत.

त्यासोबतच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल - दुरुस्तीची आणि इतर कामे करण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या या वेगवेगळ्या कामांमुळे नवी मुंबईत दोन दिवस पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे.

Navi Mumbai Water Cut
Thackeray Vs Shinde: आदित्य ठाकरे ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करु शकतील का? कुणाचं पारडं जड? वाचा सविस्तर

जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे, 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दुस-या दिवशी 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजेच 24 तासांसाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढचे एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तर 11 एप्रिल रोजी संध्याकाळचा पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने कमी दाबाने केला जाणार आहे, याची नोंद नवी मुंबईकरांनी घ्यावी.

Navi Mumbai Water Cut
Black Magic on Dog : संतापजनक! काळ्या जादूसाठी श्वानाची निर्घृण हत्या; अर्ध जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आणि कामोठे, खारघर या भागातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्याचा साठा करुन ठेवावा आणि पाण्याचा जपून करावा, असे आवाहन नवी मुंबई महानगर पालिकेने केले आहे. तसंच, पाणी कपातीच्या काळामध्ये नागरिकांनी महामंडळाला सहकार्य करावे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे देखील महापालिकेने सांगितले आहे.

Edited By - Priya Vijay More

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com