रावणाचा जीव बेंबीत होता तसा काहीजणांचा जीव मुंबईत, उध्दव ठाकरेंचा भाजपला टोला

विरोधक राज्याची बदनामी करत असल्याचा आरोप यावेळी ठाकरे केला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam Tv

मुंबई:अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. यावेळी अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाषण केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. रावणाचा जीव बेंबीत होता. तसा काही जणांचा जीव मुंबईत आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. भाजपने चार राज्यात विजय मिळवल्यानंतर राज्यातील भाजपने (BJP)मुंबईत विजयाचा आनंद साजरा केला, यावरुन ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधक राज्याची बदनामी करत असल्याचा आरोप यावेळी ठाकरे केला. विरोधक छत्रपतींच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणतात. सध्या देशात मद्यविक्रीची सर्वात कमी दुकाणे महाराष्ट्रात आहेत. तरीही विरोधक राज्याला मद्यराष्ट्र म्हणत आहेत. प्रत्येक मुद्यात विरोधक राज्याची बदनामी करत आहेत. राज्याला बदनाम करणे हे योग्य नाही. याची दखल नागरिक घेत असतात, असंही उध्दव ठाकरे म्हणाले.

भाजपने (BJP) चार राज्यात विजय मिळवल्यानंतर मुंबई (Mumbi) मध्ये विजयोत्सव साजरा केला. हा मुद्दा पकडून उध्दव ठाकरे यांनी रावणाचा मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली. 'अगोदर अस म्हटले जायचे रावणाचा जीव बेंबीत होता. म्हणून त्याला कुठेही मारले तर तो मरत नव्हता. काही जणांच असचं आहे. केंद्रात कुठेही विजय मिळवला तरी विरोधकांचा जीव मुंबईतच असतो' असा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी भाजपवर लगावला.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com