Pune : राजगडावर दुर्घटना! बालेकिल्ल्यावरून १५० फूट दरीत पडली, २० वर्षीय तरूणीचा मृत्यू

Pune tourist slips from Balekilla and dies : राजगड किल्ल्यावर गुरुवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. बालेकिल्ला पाहून परत उतरत असताना महिलेचा पाय घसरला आणि ती सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळली.
AJGAD FORT
Tragedy at Rajgad Fort: A woman tourist slipped from the Balekilla top, falling 150 feet to her death during a trek with her husband.Saam TV News
Published On

Woman dies in Rajgad fort trekking accident : पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर एक दुखद घटना घडली, ज्यामध्ये एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला. पर्यटनासाठी पतीसह आलेल्या विवाहित महिला बालेकिल्ल्यावरून उतरताना १५० फूट उंचीवरून कोसळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. महिलेला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुवारी रात्री उशिरा वेल्हे ग्रामीण रुग्णालयात महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेल्हे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कोमल सतीश शिंदे (वय-20) राहणार आळंदी असे मृत महिलेचे नाव आहे. कोमल ही पतीसह राजगडावर पर्यटनासाठी आली होती.गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बालेकिल्ला पाहून झाल्यानंतर उतरताना ती कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान मृतदेह गडावरून खाली आणण्यासाठी पोलीस जवान युवराज सोमवंशी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य तानाजी भोसले, गणेश सपकाळ यांनी मदत केली.

AJGAD FORT
Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी

राजगड हा ऐतिहासिक आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला किल्ला आहे, जो पुण्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. कोमल पतीसह राजगडावर फिरण्यासाठी आली होती. बालेकिल्ला पाहिल्यानंतर माघारी परतल्यानंतर ही घटना घडली. किल्ल्याच्या सर्वोच्च भाग असलेल्या बालेकिल्ल्यावर ही घटना घडली. कोमलचा पाय घसरला आणि खाली पडली. या महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, तपास सुरू आहे. या घटनेमुळे किल्ल्यावरील सुरक्षितता आणि ट्रेकिंग दरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

AJGAD FORT
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, कोणत्या जिल्ह्याला अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

ही घटना राजगड किल्ल्यावरील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते. बालेकिल्ला हे राजगडाचे सर्वोच्च आणि अतिशय आकर्षक ठिकाण आहे. याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र अपुऱ्या संरक्षक उपायांमुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे पर्यटकांनी ट्रेकिंग करताना योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com