'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

आज दिल्लीत १२ खासदारांनी शिंदे गटाला पांठिबा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर विविध आरोप केले. त्यांच्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Eknath Shinde And sanjay raut
Eknath Shinde And sanjay raut saam tv
Published On

मुंबई : शिवसेनेला (ShivSena) आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. आज दिल्लीत १२ खासदारांनी शिंदे गटाला पांठिबा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर विविध आरोप केले. त्यांच्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Sanjay Raut News In Marathi )

Eknath Shinde And sanjay raut
मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीकडून अटक

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्यासह १२ खासदारांवर हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, 'उद्धव ठाकरे हे सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय सांगत असतात. महाविकास आघाडीच्या वेळेला देखील युती कोणत्या परिस्थितीत करतोय हे सांगितले. महाविकास आघाडी करण्याची वेळ हे भाजपने आणलेली आहे. त्यावेळी वेळ ही भाजपने लादलेली. म्हणून महाविकास आघाडीशी युती करत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सर्वांना विश्वासात सांगितले. तेव्हा या सगळ्यांनी या प्रयोगाचे स्वागत केले'.

'ज्यांनी ठाकरेंचा शब्द पाळला नाही, त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याची संधी आहे. हे सर्व सांगणारे हे लोक आहेत. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या बंद दाराआड चर्चा झाली. त्यातला बराचसा भाग आम्हाला सांगितला. राजकारणात कितीही उलथापालथ झाली तरी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील नातं कायम होतं. आज १२ खासदार मुख्यमंत्र्यांसोबत बसले होते. त्यांना विचारू इच्छितो की, २०१४ साली आपण सर्व कुठे होता ? जेव्हा भाजपने युती तोडली, तेव्हा तुम्ही युतीमध्ये होता ना ?,असा सवाल राऊतांनी १२ खासदारांना केला.

Eknath Shinde And sanjay raut
'उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करायला तयार होते, पण...'; खासदार राहुल शेवाळे यांचा गौप्यस्फोट

'२०१४ साली भाजपने युती तोडली, त्याला शिवसेना जबाबदार नाही. ठाकरे कुटुंबावर ज्या भाषेत हल्ले करण्यात आले. यापैकी किती खासदारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले ? गेल्या अडीच वर्षात भाजपने ठाकरे कुटुंबावर शाब्दिक हल्ले केले, तेव्हा हे खासदार कुठे होते ? आम्ही कोणत्याही आघाडीत नाही. हे वारंवार सांगितले. आम्ही स्वातंत्र्य मार्ग निवडला होता. युतीचा शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. मात्र, भाजपने युतीचा शब्द पाळला नाही. एकनाथ शिंदेंची फसवणूक कोणी केली असेल, तर भाजपने केली आहे', असे संजय राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com