अक्षय बडवे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील मागील १४ दिवसांपासून उपोषण करत आहेत. मराठा आरक्षणासोबत आता अनेक समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पुढे येत आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही यावर भाष्य केलं आहे.
मराठा समाजाचा प्रश्न हा शेती मधूनच निर्माण झाला आहे. शेतीमालावर अनेक निर्बंध आले आहेत. त्यामुळे त्यांची स्थिती खराब झाली. राज्य सरकारला मराठा समाजाला मोठ्या विश्वासात घ्यावं लागेल. तसेच कृती कार्यक्रम राज्य सरकारला जाहीर करावा लागेल, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की सवादांच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतो. मनोज जरांगे यांनी चर्चेचे दरवाजे खुले ठेवावेत. त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. हात जोडून जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांची मागणी सरकार आणि समाजापर्यंत पोहोचली आहे. त्यांनीही सामजस्याची भूमिका घ्यावी. जीव धोक्यात येईल, असं टोकाचं पाऊल उचलू नये, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
आज महाराष्ट्रातले सगळे राजकारणी सत्तेला भुकेले आहेत. त्यामुळे सगळे आग लावायला लागले आहेत. आरक्षणाचा मुद्दा ५० वर्षांपासून सुरु आहेत. आज सगळे समाज एकाचवेळी आरक्षणासाठी रस्त्यांवर आलेत. ज्यांना मिळालं तेही समाज रस्त्यावर आरक्षण मागायला लागले आहेत. (Latest Marathi News)
मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला नव्हता. जेव्हा फडणवीस यांचं सरकार आलं, तेव्हापासून प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांच्या पोटात गोळा उठला आहे. त्यांनीच हे उदंड पीक महाराष्ट्रात आणलेलं आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
सरकार बदलामुळे आजची आंदोलने केली जात आहेत. जरांगे पाटलांचं आंदोलन पुरस्कृत नाही. त्यांनी अनेक वर्षांपासून अनेकदा आंदोलने केली आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.