ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला; राजू शेट्टींचा महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला

बहुमत चाचणीच्या अगोदरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
Raju Shetti
Raju ShettiSaam Tv

मुंबई: बहुमत चाचणीच्या अगोदरच शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आघाडी सरकार अडचणीत आले होते. त्यामुळे आता काही दिवसातच भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा सरकार स्थापन स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरुन आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले होते, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी करण्याची मागणी केली होती. या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे निर्देश दिले होते, पण बहुमत चाचणी अगोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

Raju Shetti
Maharashtra Political Crisis Live: उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना दिला राजीनामा; राजभवनात शिवसैनिकांची घोषणाबाजी

'महाविकास आघाडीच्या नेत्यांनो स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीच्या आड्यांचा तुम्ही एक एक बांबू उपसला पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला ! देवाच्या काठीला आवाज नसतो !!' अस ट्विट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले आहे.

Raju Shetti
'मी पुन्हा येईल असं म्हणालो नव्हतो'; राजीनामा देताना मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com