One Nation One Election : देशात आता 'वन नेशन वन इलेक्शन'? राज ठाकरे यांनी उपस्थित केले 'हे' 4 महत्त्वाचे प्रश्न

Raj Thackeray On One Nation One Election: 'एक देश एक निवडणुकी'वरून राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला चार महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.
देशात आता 'वन नेशन वन इलेक्शन'? राज ठाकरे यांनी उपस्थित केले 'हे' 4 महत्त्वाचे प्रश्न
Raj Thackeray On One Nation One ElectionSaam Tv
Published On

केंद्रीय मंत्रिमंडळाने 'एक देश एक निवडणुकी'च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली. याच बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर याची आता देशभरात चर्चा होत आहे. यावरच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

सोशल मीडिया साईट फेसबुकवर एक पोस्ट करत राज ठाकरे म्हणाले आहेत की, 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.''

देशात आता 'वन नेशन वन इलेक्शन'? राज ठाकरे यांनी उपस्थित केले 'हे' 4 महत्त्वाचे प्रश्न
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी कटोरा घेऊन फिरत आहेत; बावनकुळेंची बोचरी टीका

राज ठाकरेंचे केंद्राला 4 प्रश्न

सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे यांनी एक देश एक निवडणुकी'वर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी केंद्राला विचारलं आहे की, एखाद्या राज्याची विधानसभा बरखास्त झाली अथवा सरकार कोसळला तर त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जातील की, लोकसभेचा कार्यकाल संपायची वाट पहावी लागेल?

राज ठाकरे यांनी दुसरा प्रश्न विचारला आहे की, लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर देशातील प्रत्येक निवडणुका परत होणार का? त्यांनी तिसरा प्रश्न विचारला की, वन नेशन वन इलेक्शन ठीक मात्र राज्यातील महापालिका नगरपालिका निवडणुका घ्या, जवळपास चार वर्ष लोकप्रतिनिधी नाही ते जास्त महत्त्वाचं नाही का?

देशात आता 'वन नेशन वन इलेक्शन'? राज ठाकरे यांनी उपस्थित केले 'हे' 4 महत्त्वाचे प्रश्न
Special Report | लोकसभा- विधानसभेचं बिगुल एकत्र वाजणार?देशात 'वन नेशन वन इलेक्शन'?

राज ठाकरे यांनी चौथा प्रश्न विचारला की, स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सर्वसामान्य लोकांशी असतो, पण त्यांच्याच निवडणुका नाहीत तर सर्वसामान्य जायचे कुठे? जर निवडणुकांचे महत्त्व इतकं वाटतंय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com