राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना गृहमंत्री पक्षाच्या प्रचारात मग्न असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, राज्यात एवढी अस्वस्थता आहे आणि गृहमंत्री राज्यात नाहीत. गृहमंत्र्यांची मुख्य जबाबदारी राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे आहे की पक्षाचा प्रचार करणे महत्त्वाचे आहे, भाजपने याचा विचार करावा. (Latest Marathi News)
सातारा येथे पुसेसावळी गावात दोन गटातील वाद चिघळला. त्यानंतर हिंसाचार उसळला. साताऱ्याची घटना हे सरकारचे अपयश आहे. जालना येथे लाठीहल्ल्याचं प्रकरण झालं. महिला, मुलांना मारहाण झाली. राज्यातील विविध समाजाचे लोक विविध मागण्यासाठी आंदोलन करत आहेत, रस्त्यावर आहेत. (Political News)
राज्यात एकीकडे ही परिस्थिती असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत तर दुसऱ्या राज्यात पक्षाचा प्रचार करत आहेत. पक्ष फोडणे, ईडी, सीबीआय एवढेच उद्योग करणे जमतंय, प्रशासनात सरकारचं अजिबात लक्ष नाही. स्वार्थासाठी झालेलं हे सरकार आहे. जनतेसाठी हे सरकार नाही, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.
सरकारमध्ये नेमकं काम कोण करतंय हेच कळत नाही. सगळं कन्फ्युजन आहे. शासन आपल्या दारी म्हणजे लाठी घेऊन तुमच्या दारी पोहचले आहे. शासन आपल्या दारी म्हणजे हे फक्त जाण्या-येण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. हे सरकार असंवेदनशील आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.