Mumbai News: पावसाळ्यापूर्वीच BMC अलर्ट मोडवर, डोंगर उतारावर राहणाऱ्यांना स्थलांतरीत होण्याचे आदेश

Mumbai Rainfall: पावसाळ्यापूर्वीच बीएमसीकडून डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा आणि स्थलांतरीत होण्याचा इशारा दिला आहे. एस विभाग कार्यालयाच्या हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आदेश दिले आहेत.
पावसाळ्यापूर्वीच BMC अलर्ट मोडवर, डोंगर उतारावर राहणाऱ्यांना स्थलांतरीत होण्याचे आदेश
Mumbai Landslide News Saam Tv

मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Mumbai Rainfall) दरवर्षी दरड कोसळण्याच्या आणि भूस्खलन होण्याच्या घटना घडत असतात. या घटना यावर्षी घडू नये त्यासाठी मुंबई महानगर पालिका (BMC) अलर्ट मोडवर आली आहे. पावसाळ्यापूर्वीच बीएमसीकडून डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा आणि स्थलांतरीत होण्याचा इशारा दिला आहे. एस विभाग कार्यालयाच्या हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ आणि २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन मार्ग, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा मार्ग, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडीच्या आणि डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना प्रशासनाकडून स्थलांतरीत होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पावसाळ्यापूर्वीच BMC अलर्ट मोडवर, डोंगर उतारावर राहणाऱ्यांना स्थलांतरीत होण्याचे आदेश
Mumbai Water Stock: मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट; पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांत फक्त इतकाच पाणीसाठा

पावसाळ्यादरम्यान मुंबईत मुसळधार पावसाने दरडी कोसळण्याची, पावसामुळे डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची शक्यता असते. तसंच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात. याचपार्श्वभूमीवर बीएमसी अलर्ट मोडवर आली आहे. त्यामुळे बीएमसीकडून आधीच नागरिकांना सूचना देत स्थलांतरीत होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्यापूर्वीच BMC अलर्ट मोडवर, डोंगर उतारावर राहणाऱ्यांना स्थलांतरीत होण्याचे आदेश
Mumbai Water Supply: धरणांनी तळ गाठला...मान्सून यायला २० दिवस बाकी; BMC कडून अद्याप पाणीकपातीबाबत निर्णय नाही

या भागातील धोकादायक इमारतींना आणि झोपड्यांना एस विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना आणि नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित परिसरातील स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाश्यांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्यास महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे एस विभागाचे सहायक आयुक्त यांच्या वतीने कळविण्यात येत आहे. त्यामुळे बीएमसीकडून दिलेल्या आदेशाचे पालन करत नागरिकांनी लवकरात लवकर स्थलांतर करावे असे सांगण्यात येत आहे.

पावसाळ्यापूर्वीच BMC अलर्ट मोडवर, डोंगर उतारावर राहणाऱ्यांना स्थलांतरीत होण्याचे आदेश
Mumbai Drunk and Drive Case: पुण्यातील अपघातानंतर मुंबईतील हिट अँड रन खटले आले चर्चेत, त्या कुटुंबीयांना न्याय कधी मिळणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com