Water Level In Mumbai Lakes: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, वैतरणा धरणही लवकरच भरणार; भातसा धरणाची स्थिती काय?

Mumbai Lakes Water Level: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तलावांपैकी एक असलेला मध्य वैतरणा तलावही आता भरत आला आहे. यातील पाणीसाठा सुमारे ९१.५६ टक्के झाला आहे.
Mumbai Lakes Water Level update vaitarna and tansa dam Latest Marathi News
Mumbai Lakes Water Level update vaitarna and tansa dam Latest Marathi NewsSaam TV
Published On

Water Level In Mumbai Lakes Marathi News: भर पावसाळ्यात पाणीकपातीचा सामना करत असलेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे वैतरणा धरण देखील लवकरच काठोकाठ भरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वैतरणा धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांची पाणीकपातीपासून सुटका होणार आहे.

Mumbai Lakes Water Level update vaitarna and tansa dam Latest Marathi News
Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान ग्रेडर-मशिन कोसळून १५ कामगारांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTOS

जुलै महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे मात्र मागील १५ दिवसांतील तलावांमधील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर म्हणजे सुमारे ११ लाख दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचला आहे. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तलावांपैकी एक असलेला मध्य वैतरणा तलावही आता भरत आला आहे. यातील पाणीसाठा सुमारे ९१.५६ टक्के झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून रे ११ लाख दशलक्ष लीटर पाणी साठा जमा झाला आहे. आनंदाची बाब म्हणजे हा पाणीसाठा एकूण साठवण क्षमतेच्या ७५ टक्क्यांच्या वर आहे.

धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने आता पाणीकपात रद्द करण्याबाबतचा निर्णय केव्हा घेतला जाणार याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. मुंबईत सध्या १० टक्के पाणीकपात सुरू आहे. पाणीसाठा वाढलेला असला तरी दहा टक्के पाणी कपात रद्द करण्यासाठी अद्याप मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Mumbai Lakes Water Level update vaitarna and tansa dam Latest Marathi News
LPG Gas Cylinder Price: ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, गॅस सिलिंडरच्या किंमती घसरल्या

दरम्यान, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा भातसा तलावातील पाणीसाठा ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा तलाव पूर्ण भरणे मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहे. तलावाची पूर्ण भरून वाहण्याची क्षमता सात लाख १७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. सध्या यात चार लाख ८९ हजार ६२२ दशलक्ष लिटर साठा आहे. या तलावातून मुंबईला दररोज एक हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा

उर्ध्व वैतरणा ४९.७९ टक्के

मोडक सागर १०० टक्के

तानसा १०० टक्के

मध्य वैतरणा ८९.५१ टक्के

भातसा ६६.३८ टक्के

विहार १०० टक्के

तुलसी १०० टक्के

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com