Mumbai Air Quality Crisis : मुंबईकरांनो सावधान...मुंबईच्या विषारी हवेमुळे कॅन्सरचा धोका वाढलाय.. दिल्लीनंतर आता वायू प्रदूषणाने मुंबईत अक्षरक्ष: कहर केलाय...नेमका कशामुळे वाढलाय हा धोका? पाहूयात विशेष रिपोर्ट........ (After Delhi, Mumbai Chokes: Air Pollution Linked to Rise in Cancer Cases)
दिल्लीनंतर मुंबईत प्रदूषणाने अक्षरशः कहर केला आहे. दक्षिण मुंबईसह वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील हवा दिवसेंदिवस विषारी बनत चाललीये. ही विषारी हवा हळूहळू फुप्फुस पोखरतेय.. वाहनं, बांधकामं, शेकोटय़ा, कचरा जाळणे यांमधून निघणाऱ्या घातक आणि विषारी वायूमुळे कर्करोगाचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती मुंबईतील डॉक्टरांनी दिलीये.. याबाबत डॉक्टरांनी काय सल्ला दिलाय पाहूया...
वायू प्रदुषणानं कॅन्सर शक्य
मुंबईतील देवनार, मानखुर्द, अणुशक्तीनगर, शिवाजीनगर आजारांचे आगर असल्याचं संशोधनात निष्पन्न झालंय...या भागातील नागरिकांना अस्थमा, टीबी, कर्करोग अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतोय..
मुंबईत कॅन्सरची 'हवा'?
मुंबईच्या विषारी हवेने कॅन्सरचा धोका
मुंबईची विषारी हवा पोखरतेय फुप्फुस
देवनार, मानखुर्द, अणुशक्तीनगर आजारांचं आगार
मास्क घालण्याचा, धुरक्यात जाणं टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला
त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या. शक्य तिथे मास्कचा वापर करा. अन्यथा तुम्ही गंभीर दुर्धर आजाराच्या सापळ्यात आलाच म्हणून समजा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.