मुंबई : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेला विमा योजनेत एक मोठा बदल शासनाने केला आहे. याआधी गट अ, ब, क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना सरसकट मिळणाऱ्या १० लाख रुपयांच्या विमा रक्कमेत सरकारने दीडशे ते अडीचशे पटीने वाढ केली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना आता विमा रक्कम सरसकट १० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार आहेत. गट अ अधिकाऱ्यांना २५ लाख, तर गट ब अधिकाऱ्यांना २० लाख रुपये मिळणार आहेत. गट क व ड कर्मचाऱ्यांना १५ लाख रुपये मिळणार आहेत. (Latest Marathi News)
अपघातात अंपगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास ही मदत मिळणार आहे. विम्यापोटी आकारण्यात येणाऱ्या वार्षिक वर्गणीतही वाढ होणार आहे. सरसकट ३०० रुपयांऐवजी आता कर्मचारी वर्ग निहाय वर्गणी आकारणी केली जाणार आहे.
गट 'अ' साठी ८८५, गट 'ब' साठी ७०८ रुपये वर्गणी आणि गट 'क' व 'ड' साठी ५३१ रुपये वर्गणी आकारली जाणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.