
सुशांत सावंत
मुंबई : स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्निल लोणकर सारख्या होतकरू विद्यार्थ्यांला आत्महत्या करावी लागली होती. तेंव्हा या प्रस्थापितांच्या आघाडी सरकारने खोटा आव आणत MPSC च्या विविध प्रश्नांबाबात फक्त घोषणाच करण्यात आले होते. फक्त तोंडाची वाफ केली. विधान सभेत मोठ्या- मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल करण्यात आली आहे.
हे देखील पहा-
चार महिने उलटून गेले, तरी अजून लोकसेवा आयोगावर सदस्यांच्या नियुक्ती बाबत सरकार उदासीन आहे. २०१९ साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे अजूनही नियुक्तीसाठी झुरावं लागत आहे. कोरोना काळात लांबलेल्या परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचे वय वाढले आहे.
त्यावर सरकारने वयोमर्यादा वाढविण्याची फक्त घोषणाच केली आहे. प्रत्यक्षात मात्र, कुठलीही अंमलबजावणी न करता बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला या प्रस्थापितांनी फक्त पाने पुसली. MPSC ते आरोग्य विभागातील पदभरतीत गोंधळ घालणाऱ्या सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रति नियत साफ नाही, त्यांच्या हेतुवरच आता विद्यार्थी शंका निर्माण करत आहेत,अशा प्रस्थापितांचा मी जाहीर धिक्कार करतो.
Edited by- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.