"अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद द्या म्हणतील; 3 पक्ष असतात तेव्हा समान खातेवाटप अपेक्षित"

'गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) शिवसेनेला हवं ते करत नाहीत.'
Uddhav Thackeray/Dilip Walase Patil
Uddhav Thackeray/Dilip Walase PatilSaam TV
Published On

मुंबई : व्यक्ती दोष आणि तिरस्काराच्या भूमिकेत सरकार वेळ घालवत आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत पण त्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधी एवढी बैठक घेतली नाही. सध्या जे काही सुरु आहे ते फक्त खुर्चीसाठी सुरू असल्याची टीका भाजपनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवरती केली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) शिवसेनेला हवं ते करत नाहीत काही करा पण कारवाई करा या एकाच उद्देशाने यांना पछाडलं आहे. उद्या अडीच वर्षे झाली तर मुख्यमंत्री मला द्या असे म्हणतील जेव्हा तीन पक्ष असतात तेव्हा समान खातेवाटप अपेक्षित असते असही दरेकर म्हणाले.

Uddhav Thackeray/Dilip Walase Patil
'तिन्ही पक्षांमध्ये सध्या धुसफूस'; गृहखातं बदलण्याबाबत काँग्रेस नेत्यांचं मोठं वक्तव्य म्हणाले...

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले हा श्रेयवादाचा विषय नाही. अडीच वर्षात राज्य सरकारने काय केले हे आपण पाहिले देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न साकार होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं प्रयत्न आणि खर्च केलेला निधी यांची माहीती आम्ही दिली आहे असं वक्तव्य त्यांनी मेट्रो प्रकल्पावरती केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com