उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
Devendra Fadnavis Criticized Uddhav ThackeraySaam Tv

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Devendra Fadnavis speech in thane : 'उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार, विचारांचे नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाण्यातून टीकास्त्र सोडलं आहे. ते ठाण्यातील प्रचारसभेत बोलत होते.
Published on

विकास काटे, साम टीव्ही प्रतिनिधी

ठाणे : राज्यातील लोकसभा निवडणुकीचा आज शेवटचा टप्पा आहे. या पाचव्या टप्प्याची सांगता काही वेळात होणार आहे. पाचव्या टप्प्याची प्रचाराची सांगता होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. 'उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार, विचारांचे नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाण्यातून टीकास्त्र सोडलं आहे. ते ठाण्यातील प्रचारसभेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे

पंतप्रधान मोदींनी काल देशाची पुढची दिशा काय असेल, हे सांगितलं.

महायुतीचे नेते महाराष्ट्राच्या हिताचं बोलतात. तसेत विकासाबद्दल बोलतात.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भाषणाची सुरुवात शिव्यांनी होते.

उद्धव ठाकरे यांना नकली बोललं की, मिरची झोंबली. तुमची वागणूकच तशी आहे.

उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालं नाही, तर भाजपचा 'प्लान बी' काय? अमित शहांनी स्पष्टच सांगितलं

त्यांना ही निवडणूक दिल्लीतील वाटत नाही, तर गल्लीतील निवडणूक वाटत आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नाही, तर नकली शिवसेना आहे.

उद्धव ठाकरे फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या फक्त संपत्तीचे वारसदार आहेत. विचारांचे नाही. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत.

शिवसेनेचा भगवा ध्वज त्यांना आता फडकं वाटू लागेल, कारण त्यांच्यावर हिरवं सावट आहे.

मोदींना निवडून देण्यासाठी जो कोणी काम करेल, तो भारताचा सैनिक असेल.

लोकांच्या मनातले मोदी हे मताच्या पेटीपर्यंत पोचवायचे आहेत.

उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
Maharashtra Politics: जुमला पर्व संपतंय, येत्या ४ जूनपासून अच्छे दिन येतील; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भाजपवर टीका

ठाण्यात महायुती १४ पैकी १२ निवडून आली आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा हा आपला बालेकिल्ला आहे.

ही निवडणूक नगरसेवकांसाठी सराव आहे.

महायुतीचे कार्यकर्ते आणि घरच्यांचं मतदान आधी झालं पाहिजे.

उद्धव ठाकरे म्हणाले 48 जागा येतील, त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. ते 49 जागाही निवडून आणतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com