Maharashtra Politics : "महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे स्थिर!"; नाना पटोले अजूनही आशावादी!

Political Crisis In Maharashtra : भाजपाने अशाप्रकारे केंद्राच्या ताकदीने सरकारं पाडली हे देशानं बघितलं आहे असे अनेक गंभीर आरोप नाना पटोलेंनी केले आहेत.
नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा; राष्ट्रवादी- शिवसेनेने दिले प्रत्युत्तर
नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा; राष्ट्रवादी- शिवसेनेने दिले प्रत्युत्तरSaam Tv

मुंबई: एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यार असताना नाना पटोले (Nana Patole) यांनी मात्र अजब दावा केला आहे. उद्धव ठाकरेंशी बातचीत झाली आहे, विधानसभा बर्खास्त करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका नाही. कमलनाथ यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांशी कमलनाथ यांनी बातचीत करुन सोनिया गांधींचं म्हणणं सांगितलं आहे. तसेच कॉंग्रेस पक्ष हा पुर्णपणे सरकारसोबत आहे. सरकार बर्खास्त करण्याबाबत कुठलीही चर्चा कॅबिनेटमध्ये नाही आणि महाविकास आघाडीचं सरकार पुर्णपणे ताकदीने चालेल असा दावा त्यांनी केला आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

एकनाथ शिंदेंना असलेल्या पाठिंब्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, आमदारांना जबरदस्तीने डांबून ठेवलं गेलं आहे. आमदारांना मारहाण करण्यात आली आहे. एक आमदार पळण्याचा प्रयत्न करत होता तर त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. भाजप आज जे दाखवण्याचा प्रयत्न करतेय तो खेळ देशाची जनता बघतेय. भाजपाने अशाप्रकारे केंद्राच्या ताकदीने सरकारं पाडली हे देशानं बघितलं आहे असे अनेक गंभीर आरोप नाना पटोलेंनी केले आहेत.

दरम्यान विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू असल्याचे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेले असतानाच, राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होत आहे. ही बैठक अखेरची ठरू शकते, असे संकेत दिले जात आहेत. महाविकास आघाडीतील मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत कळेल, मी राऊत यांचे ट्विट बघितले नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा; राष्ट्रवादी- शिवसेनेने दिले प्रत्युत्तर
मला हार्ट अॅटॅक आलाच नाही, घात करण्याचा डाव; नितीन देशमुख म्हणाले, मी उद्धव ठाकरेंसोबत!

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, आज दुपारी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतरच काही ठरू शकतं, असे संकेत महाविकास आघाडीमधील एका मंत्र्यांनी दिले असतानाच, आता या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ बैठकीनंतर राजीनामा देऊ शकतात. ते राज्यपालांकडे राजीनामा देऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर विरोधी गोटातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com