Eknath Shinde News: CM शिंदेंकडून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; 'BARTI'च्या इतक्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर

Eknath Shinde On barti fellowship: डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
Eknath Shinde
Eknath Shinde Saam tv
Published On

Mumbai News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

बार्टी, सारथी, टीआरटीआय,महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Eknath Shinde
Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा धोका कायम; दिवसभरात ९ जणांचा मृत्यू, अशी आहे आजची ताजी आकडेवारी

या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि शिष्टमंडळाचे प्रतिनीधी उपस्थित होते.

यावेळी ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली. त्याचे स्वागत करतानाच विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला.

फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते.

यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय,महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश दिले.

Eknath Shinde
Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धीवर अपघात सत्र सुरूच; टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

विद्यार्थ्यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, बार्टीचे विद्यार्थी गेले काही दिवस आंदोलनाला बसले होते. त्यांची मागणी होती की जे पात्र आहेत, त्यांना सवलत आहे ती मिळाली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे.

'सर्व सामान्यांचं सरकार आहे, कोणावर अन्याय होणार नाही. 861 जणांना फेलोशिप मिळणार आहे', असेही पुढे ते म्हणाले. राज्य सरकारच्या निर्णयामुळे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com