Cm Shinde On Thackeray: 'ते बिथरलेत', फडणवीस यांना चॅलेंज देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं जोरदार प्रत्युत्तर

Cm Eknath Shinde On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. आता फडणवीस यांना आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.
'ते बिथरलेत', फडणवीस यांना चॅलेंज देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं जोरदार प्रत्युत्तर
Cm Eknath Shinde On Uddhav ThackeraySaam Tv
Published On

'एक तर तू राहशील, नाहीतर मी', असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. यातच आता फडणवीस यांना आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ''आम्ही जे काम केले, हे सगळं बघून ते बिथरले आहे. ते सगळे गोंधळले, आहे म्हणून अशी भाषा करत आहेत. राजकारणात कोणी कोणाला संपवण्याची भाषा करू नये. मीच काय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभा आहे. असं आव्हान करण्यापूर्वी आपण कोणाविषयी बोलत आहे हे, बघितलं पाहिजे.''

'ते बिथरलेत', फडणवीस यांना चॅलेंज देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं जोरदार प्रत्युत्तर
Kalamnuri Assembly Constituency: कळमनुरी विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती काय? महाविकास आघाडी की महायुती, विजयाचा गुलाल कोण उधळणार?

शिंदे म्हणाले, ''आव्हान देण्यासाठी मैदान यावं लागतं, घरात बसून आव्हान देता येत नाही. कोणालाही संपवण्यासाठी पायात टाकत असायला पाहिजे. मनगटात ताकद असायला पाहिजे.''

उद्धव ठाकरे यांना भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही उत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''उद्धवजी सध्या तुम्ही खूप त्रागा करतायत. माणसाने तेच बोलावं, पण नीट बोलावं. माझी आणि उद्धव ठाकरे यांची 40 ते 45 वर्ष ओळख आहे, ते एवढे वर्ष कधी त्रागा करत नव्हते.''

'ते बिथरलेत', फडणवीस यांना चॅलेंज देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं जोरदार प्रत्युत्तर
Wayanad Landslides Update : वायनाडमध्ये जिथे भीषण विध्वंस, तिथे पोहोचले राहुल गांधी; २७७ जणांचा मत्यू, २०० जण अजूनही बेपत्ता

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''अलीकडच्या भाषणांमध्ये आगपाखड, तेच मुद्दे लोकांनी किती वेळा ऐकावे. तुम्ही अन्याय करत होतात. म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांनी त्यांची वाट शोधली. तुम्ही त्यांचा हिंदुत्वाचा आत्मा दाबत होतात. तुम्ही किती वेळा एकनाथ शिंदेंनी अन्याय केला, अन्याय केला, असं म्हणत राहणार? बाकीचे विषय सुद्धा आहेत. मित्र म्हणून मला, असा प्रश्न आहे की, त्यांची आगपाकड का होत आहे?''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com