मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी प्रचारसंभाचा धडाका लावला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेते, पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप पदाधिकारी मोहित कंबोज यांनी मोठा दावा केला आहे.
भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी ४ जूननंतर ठाकरे सेना आणि शरद पवार गट फुटणार असल्याचा दावा केला आहे. ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे उर्वरित आमदार आणि नेते पक्षाला रामराम करणार आहेत. अनेक नेते शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 'फिरे खेला होबा' म्हणत कंबोज यांनी गोप्यस्फोट केला आहे.
मोहित कंबोज यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं की, 'ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे आमदार ४ जूननंतर फुटणार आहेत. या पक्षातील नेते हे इतर पक्षाच्या संपर्कात आहेत'. कंबोज यांच्या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मोहित कंबोज यांच्या दाव्यानंतर शंभुराज देसाई यांनी दुजोरा दिला आहे. शंभुराज देसाई म्हणाले, 'अनेक लोकांनी आतून आम्हाला मदत केली आहे. आज आम्ही त्यांची नावे सांगणार नाही, पण ४ जूननंतर महायुतीमध्ये हा लोंढा येईल'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.