हा आहे अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाचा आक्रोश.... अतिवृष्टीनं फक्त कपाशीच उद्ध्वस्त झाली नाही तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखलही झालाय...याच चिखलाने माखलेल्या, अतिवृष्टीने खचलेल्या बळीराजाचा हा उद्वेग...
हिरापूरच्या राजेंद्र ओडमारेंचा कित्येक एकरावरचा ऊस पुराच्या पाण्यात वाहून गेलंय.. . आता आम्ही जगायचं कसं? असा सवाल ओलावलेल्या डोळ्यांनी राजेंद्र ओडमारे करतायत...फक्त कापूस आणि ऊसच नाही तर तरारुन आलेल्या तुरीतही अतिवृष्टीमुळे गुडघ्याइतकं पाणी साचलंय.. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या घासाची माती झालीय...
अतिवृष्टीने फक्त मराठवाडा आणि अहिल्यानगरमधील शेतकरीच उद्ध्वस्त झाला नाही.. तर सोलापूर जिल्ह्यातही भीषण परिस्थिती निर्माण झालीय.. सीनेनं सगळा संसारच गिळल्याने हतबल झालेल्या माढा तालुक्यातील सावंत कुटुंबियांनी तीन दिवसांपासून अन्नाला हात लावला नाहीये...
तर लेकरासारखी जपलेल्या जनावरांनी डोळ्यापुढं जीव सोडल्याचं पाहून शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलंय..खरंतर लवकर पाऊस झाला.. त्यामुळं पेरणीही लवकर झाली.. आणि आता पीक तरारुन आलं.. त्यामुळं डोक्यावरचं दहा लाखांचं कर्ज फिटेल, अशी आशा निर्माण झाली होती.. मात्र आता सगळं काही संपल्याची हतबलता हरिराम मुंताळ या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतेय...
अतिवृष्टीमुळे बळीराजा हतबल झालाय.. सगळं काही हातातून निसटून गेल्यानं तो हतबल झालाय.. त्यामुळे कोलमडून पडलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी सरकार मदत देईलच.. पण आपल्या ताटातल्या भाकरीला जागून आपणही मोडून पडलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी मदतीचा हात पुढं करणं गरजेचं आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.