परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) ग्रामीण भावात रस्त्यांचा प्रश्न अजून देखील गंभीर बनलेला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी रस्त्यांच्या प्रश्नावर काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काल सायंकाळच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील थळीउक्कलगाव, शेळगावं परिसरात काल दमदार पाऊस झाला. परिणामी परिसरातील फालगुणी नदीला अचानक पूर आल्याने परिसरातील नागरिकांना गुडग्या एवढ्या पाण्यातून वाट काढावी लागली.
गावाकडे जाण्यासाठी फालगुणी नदीवरील पूल हा एकमेव मार्ग असल्याने नागरिकांची मोठी दमछाक झाली. अक्षरशः महिला, लहान मुलांचा जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करावा लागला. प्रशासनाने तात्काळ फालगुणी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी परिसरात नागरिकांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.