पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा; शिंदे सरकारने दिली अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ

शिंदे सरकारने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे.
Police Bharti
Police Bharti Saam TV

सुशांत सावंत

Police Bharti 2022 : शिंदे सरकारने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिंदे सरकारच्या निर्णयामुळे अर्ज भरताना वेबसाईट सतत हँग होणे, सर्व्हर डाऊन असणे अशा विविध समस्यांना सामोरे जाणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वेबसाईट सतत हँग होणे, सर्व्हर डाऊन असणे अशा विविध समस्यांना जावे लागत होते. त्यामुळे अनेक उमदेवारांचे अर्ज करणे रखडले होते. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी उमेदवारांची होती.

या पोलीस (Police) भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसहित राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अर्ज भरण्यासाठी १४ दिवसांची मुदतवाढ मिळावी, ही उमदेवाराची मागणी शिंदे सरकारकडे लावून धरली होती.

Police Bharti
Maharashtra Politics : शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगात होणार सुनावणी; दोन्ही गट समोरासमोर करणार युक्तिवाद

दरम्यान, आज मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ केल्याच्या निर्णयाची घोषणा केली. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

यावेळी शिंदे सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 'आदिवासी कोट्यातील एसटीची भरती प्रकिया एक महिन्यात करण्याचे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत १ हजार रुपयात दस्तऐवज होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

गायरान जमिनीच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, 'गायरान जमिनीवर ज्यांची घरे आहेत, त्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत कायमस्वरूपी देण्याचा निर्णय आपण घेत आहोत'. तर वीज बिल ट्रान्सफॉर्मवर वीज भरले, त्यांची वीजेचे कनेक्शन तोडण्यात येणार नाही. सरसकट कोणाचीही वीज कापली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com