राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन व्यक्तींनी भेटून २८८ पैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. पवार यांनी सांगितले की, या दोघांनी त्यांना आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ही ऑफर दिली होती. मात्र, निवडणूक आयोगावर विश्वास ठेवून या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. राहुल गांधी यांनी नुकत्याच मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर पवार यांनी हा दावा केला आहे. या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पवारांचा दावा हास्यास्पद ठरवत त्या दोन व्यक्तींचा शोध घेण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही पवारांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. शरद पवार इतक्या दिवस शांत का होते? असा सवाल उपस्थित केला आहे. इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत? राहुल गांधींसोबतच्या भेटीचा हा परिणाम दिसतोय. निवडणूक आयोगाने बोलवल्यास कुणीही समोर जात नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.