'राज्यसभेत झालं तेच विधानपरिषदेत होईल, संजय राऊतांनी अपक्ष आमदाराचा अपमान केला आहे'

'सत्ता ही लोकांसाठी लोकांच्या भल्यासाठी असते. दुर्दैवाने त्यांना सत्तेचा माज आला आहे.'
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV

नागपूर : राज्यसभेच्या निकालामुळे महाराष्ट्रातील जनता खुश आहे. कारण, महाराष्ट्रातील या सरकारला जनता वैतागली आहे. फक्त जनताच नाही तर सर्व पक्षांसह अपक्ष आमदार हे सुद्धा वैतागलेले आहेत. ज्यांचे मंत्री कमिशन घेतात, मुख्यमंत्री जनतेला भेटत नाहीत. तर जनतेचे काम कसे करणार. त्यामुळे शेतकरी शेतमजूर सगळे वैतागलेत. या सरकारमुळे महाराष्ट्राचे वाटोळे होत असल्याचं वक्तव्य भाजपनेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलं आहे.

लोकांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्री काळाची आठवण होत आहे, पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे असे त्यांना वाटत असल्याचंही बोंडे म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) देखील निशाणा साधला ते म्हणाले, 'आता शिवसैनिक म्हणायला लागले आहे की संजय राऊत यांनी बोलणं थांबवलं पाहिजे, सत्ता ही लोकांसाठी लोकांच्या भल्यासाठी असते. दुर्दैवाने त्यांना सत्तेचा माज आला आहे.'

तसंच जे राज्यसभेत झालं तेच विधानपरिषदेत होईल, शिवसेनेचे संजय राऊत यांनी अपक्ष आमदाराचा अपमान केला आहे, घोडेबाजारात आमदार विकले गेले असा आरोप केला, हा आरोप संजय राऊतच करू शकतात आणि तो त्यांनी केला आहे. कोणाचाही अपमान कोणीही करू नये, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तो वर असे आरोप करू नये. मात्र, अपमान संजय राऊत यांनी केला.

तसंच अपक्ष आमदारांच्या जनतेसाठी निधी मागतो मुख्यमंत्री आणि त्यांच्या विश्वासाचा माणुस जर घोडा म्हणणार असेल तर हा निश्चित गाढवपणा आहे असा टोला त्यांनी लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com