सांगली : कंत्राटदार हर्षल पाटील याच्या आत्महत्येनंतर सरकारच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. कारण राज्यातील कंत्राटदार आक्रमक झाले असुन कंत्राटदारांची थकीत बिले जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत काम बंद करण्याचा निर्णय कंत्राटदारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे आता राज्यातील सर्व कंत्राटदारांनी आपले कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
सांगली जिल्ह्यातील कंत्राटदार हर्षल पाटीलने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने राज्यभरातील कंत्राटदार एकवटले असून आंदोलन छेडले आहे. दरम्यान हर्षल पाटील याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीमध्ये कंत्राटदार संघटनांच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आलं होते. या वेळी पार पडलेल्या बैठकीमध्ये राज्यातील हजारो कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले थकविल्याप्रकरणी चर्चा करण्यात आली.
कामबंदचा एकमताने निर्णय
दरम्यान शासनाकडून कोट्यवधींची बिले थकित असून राज्यभर परिस्थिती गंभीर असल्याने जोपर्यंत थकीत बिले दिली जात नाहीत, तोपर्यंत राज्यातील सर्व कामे बंद करण्याचा निर्णय सांगलीतील अभियंता आणि कंत्राटदार संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अर्थात राज्यातील सर्व कंत्राटदार बिल मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
जालना जिल्ह्यातील कंत्राटदार करणार सामूहिक आत्मदहन
जालना : सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने शासनाकडे बिल थकीत असल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर जालना जिल्ह्यातील कंत्राटदारांची देखील शासनाकडे ४०० कोटीपेक्षा अधिक बिले थकीत असून शासनाने लवकरात लवकर बिल न दिल्यास जिल्ह्यातील कंत्राटदार १५ ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने अमर्यादित निविदा काढून निवडणूक जिंकली. हे स्वतः गुहाटीला जाऊ शकतात. मात्र छोट्या कंत्राटदाराला शासन पैसे देत नाही. महाराष्ट्र शासन तरुणाईला संपायला निघाले आहे. असा संताप देखील व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.