Sambhajinagar Jalgaon Highway : संभाजीनगर ते जळगाव मार्ग बारा वर्षांनंतरही पूर्ण होईना; अजिंठा लेणीवर जाणाऱ्या पर्यटकांना त्रास

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेणीपर्यंतच्या रस्त्याने ४ नोव्हेंबर २०१५ रोजी चीनचे उपराष्ट्रपती ली यांचो यांचा ताफा गेल्यावर खराब रस्त्याबाबत राज्य शासनाकडे तक्रार केली होती.
Sambhajinagar Jalgaon Highway
Sambhajinagar Jalgaon HighwaySaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला जाण्यासाठी असलेला छत्रपती संभाजीनगर ते जळगाव मार्गाचे काम गेल्या १२ वर्षांपासून सुरु आहे. तरी देखील या मार्गाचे काम अद्याप पूर्ण होत नाही. परिणामी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या जगातील वेगवेगळ्या देशातल्या पर्यटकांना होणारा त्रास हा जागतिक पातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करणारा ठरत आहे. शिवाय या मार्गावरुन जाणाऱ्या वाहन धारकांना त्रास कायम आहे. 

छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेणीपर्यंतच्या रस्त्याने ४ नोव्हेंबर २०१५ रोजी चीनचे उपराष्ट्रपती ली यांचो यांचा ताफा गेल्यावर खराब रस्त्याबाबत राज्य शासनाकडे तक्रार केली होती. यामुळे २०१५ मध्ये जागतिक पातळीवरून टीका सुरू झाल्यानंतर रस्त्यावर ३० कोटी रुपयांचा निधी देत डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये १५ कोटींतून डागडुजी करण्यात आले. त्यानंतर २०१९ मध्ये केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या वतीने १ हजार कोटींतून चौपदरीकरण करण्याला सुरुवात झाली. 

Sambhajinagar Jalgaon Highway
Jalgaon Crime : सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री, लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

सहा वर्षांपासून चौपदरीकरणाचे काम सुरु 

अर्थात संभाजीनगर ते जळगाव या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या कामाला सुरवात झाली. गेली सहा वर्ष उलटल्यानंतर देखील अजून पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. अजूनपर्यंत या महामार्गच्या चोपरीकरणचे काम सुरु असल्याने काही ठिकाणी एकतर्फी रहदारी सुरु आहे. परिणामी वाहनांचा खोळंबा होत असल्याने वाहधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता देशी विदेशी परतेकांसमोर या रस्त्यावरून नाचक्की झाली आहे.

Sambhajinagar Jalgaon Highway
Pimpri Chinchwad : गंभीर गुन्ह्याच्या शिक्षेतून सुटका होताच गांजा विक्री; महिला आरोपी फरार, तिघेजण ताब्यात

काम पूर्ण करण्याबाबत तारीख पे तारीख 
छत्रपती संभाजीनगर येथून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर बदनाम होण्याचा प्रसंग ओढवला आहे. २०१५ पासून या रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्यामुळे पर्यटकांना चिखलयुक्त मार्गावरून वाहने न्यावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एनएच विभागाकडून तारीख पे तारीख जाहीर करण्यात येत आहे. आता या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार आणि तो कधी चांगला होणार असा प्रश्न पर्यटक आणि छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रस्त्यावरील राहणाऱ्या नागरिकांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com